शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Diwali2017 Calendar : दिवाळी साजरी करण्यामागची कारणं आणि प्रतिकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:20 IST

भारतात दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असली तरीही त्याचं स्वरुप वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगळा असतो.

ठळक मुद्देजगभरात तसंच देशभरात दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वरुप वेगळे असतेअशाप्रकारे मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या सणाची लोकं वर्षभर वाट पाहत असतात.मात्र आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपण दिवाळी का साजरी करतो हे माहीत नसतं

सर्वप्रथम सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा, असं म्हणत आपण कधीच दिवाळीच्या तयारीला लागलो होतो. मात्र आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपण दिवाळी का साजरी करतो हे माहीत नसतं. आजच्या या लेखात आपण वरवरचा आढावा घेऊया की दिवाळी का साजरी केली जाते आणि त्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय असतं.

वसुबारस

वसुबारस या दिवसाने दिवाळीची सुरुवात होते. काही ठिकाणी पहिल्या दोन दिवसांना लहान दिवाळी असेही म्हटले जाते. यादिवशी गाय आणि वासराची पुजा केली जाते. गायीचं दुध भारतीय शेतकरी कुटूंबांसाठी उदरनिर्वाहाचा एक पर्याय आहे. त्यामुळे गायीला आई मानून तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी

यादिवशी वैद्य आपल्या साधनांची तर व्यापारी लोकं आपल्या चोपड्यांची पूजा करतात. वेगवेगळ्या व्यवसायातील लोकं शस्त्रपूजा तसंच धनपूजा अर्थात लक्ष्मीपूजा करतात. घरात, व्यापारात आणि व्यवसायात नेहमी भरभराट होवो, संपन्नता राहो म्हणून धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. एक शुभ मुहूर्त मानून लोकं काही नवीन वस्तु अथवा वास्तुंमध्ये पैश्याची गुंतवणुक करतात किंवा खरेदी करतात.

नरकचतुर्दशी

बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवसाला दिवाळीची खरी सुरुवात समजतात. तर काही ठिकाणी याला मोठी दिवाळी असंही म्हणतात. यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध करुन इतरांना त्याच्या भयाण त्रासात मुक्त केल्याची कथा आहे. त्या मुक्तीच्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. चांगल्याचा वाईटावर विजय या प्रतिकासाठी हा दिवस साजरा होतो.

लक्ष्मीपूजन

या दिवसाला एक फार शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. घरातील सोनं, पैसे किंवा महागड्या किंमती वस्तु देवासमोर मांडून त्याची पुजा केली जाते. या वैभवासाठी देवाचे आभार मानले जातात. लक्ष्मीने प्रसन्न व्हावे आणि कायम आपल्याकडे वास करावा यासाठी तिची आराधना केली जाते.

बलिप्रतिपदा

बलीप्रतिपदा हा दिवस साजरा करण्यामागेही एक आख्यायिका आहे. बली नावाचा अतिशय श्रीमंत आणि धनवान राजा होता. त्याला त्याच्या संपत्तीचा गर्व झाला होता. आपल्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही असा त्याचा समज झाला होता. त्याचा हा गर्व कमी करण्यासाठी श्रीकृष्ण वामनाचं रुप घेऊन त्याच्याकडे पोहोचला. पाहुण्याच्या पाहुणचारात कोणतीही उणीव राहू नये, याची बलीने दक्षता घेतली. मात्र वामनला हे काहीच नको होते. त्याने फक्त तीन पाऊले जागेची मागणी केली. तेव्हा बलीला ती गंमत वाटली, त्याने ती मागणी हसत हसत मान्य केली. मात्र नंतर कृष्णाने अर्थात वामनाने आपले अवाढव्य रुप सादर केले. त्याने एक पाऊल स्वर्गावर ठेवले तर दुसरे पृथ्वीवर. मात्र तिसरे पाऊल ठेवायला त्याला जागा उरली नाही. मग शब्द दिल्याप्रमाणे बली राजाने आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवावे, असे वामनाला म्हटले.अशाप्रकारे बलीराजाचा गर्व कुठच्या कुठे निघून गेला आणि तो नम्रतेत आला. त्यामुळे नम्रतेचे प्रतिक म्हणून आणि गर्वाचा नाश म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

दिवाळी पाडवा

पाडव्याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. यादिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळतात. त्यांच्या आवडीचे जेवण करुन त्यांना खाऊ घालतात. पती-पत्नीमधील प्रेम आणि सहवास वृध्दींगत व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पती आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून पत्नीला एखादी भेटवस्तु देतो. नवविवाहीत जोडप्यांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि विशेष असतो.

भाऊबीज

जगात फक्त भारतातच भाऊबीजेसारखं पवित्रं नातं साजरं केलं जातं. या नात्यात प्रेम, रुसवे-फुगवे, खोड्या, सहकार्य, मदत, गंमती, मजा-मस्ती अशा सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यादिवशी बहिण भावाला ओवाळते. ते दोघे एकमेकांना भेटवस्तु देतात. गोड-धोड खाऊ घालतात. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी किंवा कामानिमित्त बाहेर राहणारा भाऊ यांची यानिमित्ताने वर्षभरातून एकदा भेट होते. सर्व कूटुंब यानिमित्ताने एकत्र येतं.

   जगभरात तसंच देशभरात दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वरुप वेगळे असते. हा सण भारतात लांबीने आणि महत्त्वाने फार मोठा मानला जातो. दरम्यान लोकं सर्व कूटुंब, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींची भेट घेतात. त्यांना फराळांची आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. अशाप्रकारे मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या सणाची लोकं वर्षभर वाट पाहत असतात.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण