शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आडवाणींना आणीबाणीची भीती का वाटते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 22, 2015 09:39 IST

लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - देशाच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपांतर्गत घडामोडींविषयी आडवाणींना जर काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्ट पणे बोलायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
तसेच आडवाणींसारख्या नेत्यांनीच आणीबाणीची भीती व्यक्त केल्याने त्याकडे साफ दुर्लक्षही करून चालणार नाही असा इशाराही त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात : 
आडवाणींनी राजकारणात मोठा संघर्ष केला आहे. ते अनेक चढ-उतारांना सामोरे गेले आहेत. आज भाजपच्या राजकारणात ते थोडे बाजूला पडले असले तरी या तपस्वी राजकारण्यास दुर्लक्षित करून चालणार नाही हे भाजपमधील व प्रसारमाध्यमांतील मोठ्या गटास वाटते. आडवाणी यांना भाजपअंतर्गत घडामोडींविषयी काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्टपणे बोलायला हवे. कारण पक्षात कितीही घुसमट झाली तरी मधल्या काळात मुरली मनोहर जोशी, कीर्ती आझाद अशा नेत्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते, हे कोडेच आहे
 
भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सामनातूनही भाजपावर निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे.