शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आडवाणींना आणीबाणीची भीती का वाटते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 22, 2015 09:39 IST

लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - देशाच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपांतर्गत घडामोडींविषयी आडवाणींना जर काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्ट पणे बोलायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
तसेच आडवाणींसारख्या नेत्यांनीच आणीबाणीची भीती व्यक्त केल्याने त्याकडे साफ दुर्लक्षही करून चालणार नाही असा इशाराही त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात : 
आडवाणींनी राजकारणात मोठा संघर्ष केला आहे. ते अनेक चढ-उतारांना सामोरे गेले आहेत. आज भाजपच्या राजकारणात ते थोडे बाजूला पडले असले तरी या तपस्वी राजकारण्यास दुर्लक्षित करून चालणार नाही हे भाजपमधील व प्रसारमाध्यमांतील मोठ्या गटास वाटते. आडवाणी यांना भाजपअंतर्गत घडामोडींविषयी काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्टपणे बोलायला हवे. कारण पक्षात कितीही घुसमट झाली तरी मधल्या काळात मुरली मनोहर जोशी, कीर्ती आझाद अशा नेत्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते, हे कोडेच आहे
 
भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सामनातूनही भाजपावर निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे.