शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आडवाणींना आणीबाणीची भीती का वाटते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 22, 2015 09:39 IST

लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - देशाच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपांतर्गत घडामोडींविषयी आडवाणींना जर काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्ट पणे बोलायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
तसेच आडवाणींसारख्या नेत्यांनीच आणीबाणीची भीती व्यक्त केल्याने त्याकडे साफ दुर्लक्षही करून चालणार नाही असा इशाराही त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात : 
आडवाणींनी राजकारणात मोठा संघर्ष केला आहे. ते अनेक चढ-उतारांना सामोरे गेले आहेत. आज भाजपच्या राजकारणात ते थोडे बाजूला पडले असले तरी या तपस्वी राजकारण्यास दुर्लक्षित करून चालणार नाही हे भाजपमधील व प्रसारमाध्यमांतील मोठ्या गटास वाटते. आडवाणी यांना भाजपअंतर्गत घडामोडींविषयी काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्टपणे बोलायला हवे. कारण पक्षात कितीही घुसमट झाली तरी मधल्या काळात मुरली मनोहर जोशी, कीर्ती आझाद अशा नेत्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते, हे कोडेच आहे
 
भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सामनातूनही भाजपावर निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे.