शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:54 IST

दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.

ठळक मुद्देजो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्लीपावसाळ्यात आमदारांच्याच उड्या जास्त

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचेच सरकार सत्तेत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातही भाजपची हवा निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेना युती स्वत:च्या ताकदीवर पुन्हा सत्तेत येईल, असे वातावरण असताना या दोन्ही पक्षांकडून दोन्ही काँग्रेसमधील आमदारांपासून ते अगदी तिसऱ्या चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही पक्षांत घेतले जात आहे. त्यावर टिप्पणी करताना ‘जो डर गया... समझो वो भाजप में गया...!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने ‘पक्ष बदलण्याची अंतिम तारीख’ही ठरवून द्यावी, अशी सूचना एका बहाद्दराने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी ‘मेगाभरती’ करण्याचे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ देत ‘तरीच मुख्यमंत्रीसाहेब बोलले होते, आम्ही निवडणुकीपूर्वी मेगाभरती घेऊ. आम्ही येडे नोकरीची समजलो... हे तर पक्षांतर हाय..!!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. साठ वर्षांनंतर जे काँग्रेसचे झाले, ते बहुधा ही मंडळी भाजपमध्ये जाऊन त्यांची काँग्रेस करणार, अशीही भीती एकाने व्यक्त केली आहे.

  • दरवाजावर टकटक झाली.

आहेत का आमदारसाहेब घरात ?नाही; बाहेर गेलेत.कधी येणारेत?येतील तासाभरात.बरं, त्यांना सांगा, निमंत्रण द्यायला आलो होतो.कोण आलेलं म्हणून सांगू? बघू पत्रिका.छे छे, लग्नाचं वगैरे नाही आमंत्रण, भाजपमध्ये येण्याचं.पण तुम्ही कोण?हे ‘ईडी’वाले आणि मी ‘आयकर’वाला!अहो, साहेबच तिकडं गेलेत. तुम्ही निमंत्रण द्यायला येणार कळल्यावर.बर झालं, मग कामच झालं.

  • कमळ उगवण्यासाठी दलदल पाहिजे ना? दलदल तिथे काँग्रेस गवत उगवणारच!

निसर्गाचा नियम बाबा !!दुसरं काय !!!

  • ‘राष्ट्रवादी’तील कार्यकर्त्यांच्या बायकांचा नवीन उखाणा

सोनेरी हरणाचे फताडे-फताडे पायआमचे हे दिसत नाहीत....भाजपात गेले की काय?

  • कंडक्टर : तिकीट, तिकीट... कुठं जायचं...?

दोन भाजप द्या...!!

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर