शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:54 IST

दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.

ठळक मुद्देजो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्लीपावसाळ्यात आमदारांच्याच उड्या जास्त

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचेच सरकार सत्तेत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातही भाजपची हवा निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेना युती स्वत:च्या ताकदीवर पुन्हा सत्तेत येईल, असे वातावरण असताना या दोन्ही पक्षांकडून दोन्ही काँग्रेसमधील आमदारांपासून ते अगदी तिसऱ्या चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही पक्षांत घेतले जात आहे. त्यावर टिप्पणी करताना ‘जो डर गया... समझो वो भाजप में गया...!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने ‘पक्ष बदलण्याची अंतिम तारीख’ही ठरवून द्यावी, अशी सूचना एका बहाद्दराने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी ‘मेगाभरती’ करण्याचे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ देत ‘तरीच मुख्यमंत्रीसाहेब बोलले होते, आम्ही निवडणुकीपूर्वी मेगाभरती घेऊ. आम्ही येडे नोकरीची समजलो... हे तर पक्षांतर हाय..!!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. साठ वर्षांनंतर जे काँग्रेसचे झाले, ते बहुधा ही मंडळी भाजपमध्ये जाऊन त्यांची काँग्रेस करणार, अशीही भीती एकाने व्यक्त केली आहे.

  • दरवाजावर टकटक झाली.

आहेत का आमदारसाहेब घरात ?नाही; बाहेर गेलेत.कधी येणारेत?येतील तासाभरात.बरं, त्यांना सांगा, निमंत्रण द्यायला आलो होतो.कोण आलेलं म्हणून सांगू? बघू पत्रिका.छे छे, लग्नाचं वगैरे नाही आमंत्रण, भाजपमध्ये येण्याचं.पण तुम्ही कोण?हे ‘ईडी’वाले आणि मी ‘आयकर’वाला!अहो, साहेबच तिकडं गेलेत. तुम्ही निमंत्रण द्यायला येणार कळल्यावर.बर झालं, मग कामच झालं.

  • कमळ उगवण्यासाठी दलदल पाहिजे ना? दलदल तिथे काँग्रेस गवत उगवणारच!

निसर्गाचा नियम बाबा !!दुसरं काय !!!

  • ‘राष्ट्रवादी’तील कार्यकर्त्यांच्या बायकांचा नवीन उखाणा

सोनेरी हरणाचे फताडे-फताडे पायआमचे हे दिसत नाहीत....भाजपात गेले की काय?

  • कंडक्टर : तिकीट, तिकीट... कुठं जायचं...?

दोन भाजप द्या...!!

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर