शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य क्षेत्रातील जातीय दहशतवादावर कोण बोलणार?; रा. रं. बोराडे यांचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 01:35 IST

मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

प्रज्ञा केळकर-सिंग / स्नेहा मोरे संत साहित्य गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : वाङ्मयाच्या प्रांगणात उघडपणे आलेला जातीयवाद साहित्याचे तुकडे करणारा असून, हादेखील एक प्रकारचा दहशतवादच आहे. देशातील दहशतवादावर सगळे बोलतात, पण साहित्यातील या दहशतवादाबद्दल कोण बोलणार, असा परखड सवाल ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी उपस्थित केला. ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर व्यासपीठासमोर माजी मंत्री बसवराज पाटील उपस्थित होते.

आपल्या भाषणात बोराडे यांनी साहित्य क्षेत्रातील जातीयवादावर चांगलेच कोरडे ओढले. ते म्हणाले, लेखक, कलावंतांना जात नसते. परंतु तरीही पारितोषिके देताना आपल्याच जातीच्या लेखकांचा विचार होतो. गल्लीतील पारितोषिके घेऊन लेखक स्वत:ला मिरवतात. ही प्रसिद्धी म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे असतात. ते कधी नष्ट होतील सांगता येत नाही. लेखक स्वत:च्या पलीकडे पाहायला तयार नाही. एक वादळ आले तर ते कोसळतील. त्यामुळे स्वत:पुरते पाहू नका. इतरांना लिहिते करा, असा सल्ला त्यांनी लेखकांना दिला.

लेखक एकमेकांची पुस्तके वाचत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना बोराडे म्हणाले, वाचक कमी होत चालला आहे हे आपण आता मान्य करूया. साहित्यिकांनी एकमेकांची पुस्तके वाचली तरी मराठीचे भले होईल. चांगले लेखक व्हायचे असेल, तर आधी चांगले वाचक व्हा. मी स्वत: एकपटीने लिहिले आणि दहापटीने वाचले. तुम्ही लिहीत राहा, कोण काय म्हणते याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहा. कोणत्याही एका साहित्यप्रकारात अडकू नका. बालसाहित्याच्या सद्यस्थितीवरही बोराडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सकस बालसाहित्य कमी प्रमाणात तयार होत आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोचतेच असे नाही. माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर व्हावा, असे पालकांना वाटते. संशोधक, लेखक, चित्रकार, अभिनेता व्हावा असे पालकांना वाटत नाही. संस्कृती, देशाची ओळख कलावंतावरून केली जाते, हे विसरून चालणार नाही. नव्या पिढीला लिहितं करा, अन्यथा भविष्य वाईट असेल. आपल्या अवतीभोवती अनेक प्रतिभावान मुले, शिक्षक, नवोदित साहित्यिक आहेत, हे सांगताना प्राचार्य बोराडे यांनी नांदेडमधील दहावी वर्गातील नचिकेत मेकाले, सांगोल्याची सोनाली गावडे, सांगलीतील चौथीचा गौतमच्या गोष्टी लिहीणारा मुलगा, शिक्षक युवराज माने, शिवाजी अंबुलगेकर, प्रा. विद्या सुर्वे, अनिता यलमटे यांचा आवर्जुन उल्लेख केला.

प्रमुख कार्यवाह डॉ. दादा गोरे म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत दोन निमंत्रणे आली आहेत. यात नाशिक आणि अंमळनेर येथून आलेल्या निमंत्रणाचा समावेश आहे. धुळे आणि गोवा येथूनही निमंत्रण येण्याची शक्यता आहे.महानगरांमध्ये संमेलने घेणे कमी करा...महामंडळाने महानगरांमध्ये साहित्य संमेलन घेणे हळूहळू कमी करावे. जिथे खरी सांस्कृतिक भूक आहे, तेथे संमेलने भरावीत. मिरवणे हे साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट नसले पाहिजे. साहित्यिक वातावरण निर्माण करणे, हे उद्दिष्ट असले पाहिजे. ग्रामीण भागात साहित्य, नियतकालिके, प्रकाशन संस्था निर्माण होणे आवश्यक असते. परिसरात वाचक निर्माण झाला की ग्रंथालये, पुस्तकाची दुकाने निर्माण होतात, असेही बोराडे म्हणाले.

दिब्रिटो यांचे भाषण वाचून दाखविलेदिब्रिटो यांचे भाषण समारोपात वाचून दाखवण्यात आले. माहितीचा विस्फोट होत आहे. माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे. माहितीचा योग्य वापर आणि त्याचे ज्ञानात रूपांतर ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकात टिकून रहायचे असेल तर धर्माधर्मात मैत्री होणे आवश्यक आहे. संतांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. तोच संदेश घेऊन मी आजवरची वाटचाल केली आहे. आयोजकांनी माझ्यासारख्या शेतकºयाच्या मुलाला संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान दिला. सर्वांकडून मिळालेले प्रेम मी कधीच विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षांच्या भाषणाशी सहमत...संमेलनाध्यक्षांचे भाषण मी ऐकले आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. मात्र, सृजनशील लेखक राजकीय विषयांवर बोलतात, पण सृजनशील पातळीवर का येत नाहीत, त्याबद्दल का बोलत नाहीत? मराठीत किती राजकीय साहित्य उपलब्ध आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. योग्य वयात लग्न केलं पाहिजे. उशिराने लग्न करणाऱ्यांना घोड नवरा म्हणतात. त्यामुळे २००२ साली मी ठरविले की यापुढे कोणताही पुरस्कार घ्यायचा नाही. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाले की ठरविले आता संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे नाही. अर्थात मला घोड नवरा व्हायचे नाही, असे प्राचार्य बोराडे म्हणताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला.

संमेलन यशस्वी : स्वागताध्यक्ष नितीन तावडेस्वागताध्यक्ष नितीन तावडे म्हणाले, साहित्य संमेलन उस्मानाबादला व्हावे यासाठी सात आठ वर्षे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले, याचे समाधान आहे. पिंपरी चिंचवडच्या समेलनानंतर महामंडळ विदर्भात गेले. त्यामुळे मागणी काहीशी शिथिल केली. महामंडळ मराठवाड्याकडे आल्यावर मागणी पुन्हा चिवटपणे लावून धरली. निवडणुकीपूर्वी संमेलनस्थळ घोषित झाले आणि उस्मानाबादकरांनी जल्लोष केला. आचारसंहितेत संमेलन अडकले नाही, हे सुर्दैव. धावपळ, कष्ट करून हे संमेलन उभे राहिले आणि यशस्वी झाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन