शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेचे संपूर्ण ६ उमेदवार निवडून आली आहे. त्यामुळे यावेळी सेनेकडून जिल्ह्याला एकतरी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेतून निवडून आलेल्या ६ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार याबाबतीत जिल्ह्यात चर्चेला वेग आला आहे. तर अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ व प्रदीप जैस्वाल यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे शिवसेना वेतेरिक्त दुसरा पर्याय नाही. तसेच भाजपसोबत आली नाही किंवा सेनेने दुसऱ्या पर्यायाचा उपयोग केला तरीही सत्तेत शिवसेनाचं असणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतून निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची स्वप्न पडू लागली आहे. गेल्यावेळी अर्जुन खोतकरांच्या रूपाने जालना जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले होते. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे यावेळी औरंगाबाद जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादचा विचार केला तर, जिल्ह्याचे खासदार राहिलेले आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले प्रदीप जैस्वाल, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्चिममधून तिसऱ्यांदा निवडून आलेले संजय शिरसाठ व पैठण मतदारसंघातून पाचव्यांदा विजय मिळवणारे संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोण आहेत प्रदीप जैस्वाल

कट्टर शिवसैनिक आणि जिल्ह्यातील सेनेचे जेष्ठ नेते म्हणून प्रदीप जैस्वाल यांची ओळख आहे. १९९६ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनतर २००९ ला पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राजकीय  अनुभवाचा विचार करता त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अब्दुल सत्तार

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तिसऱ्यांदा आपला गड कायम ठेवत विजय मिळवणारे अब्दुल सत्तारांचे नाव विविध कारणाने राज्याच्या राजकरणात चर्चेत राहिलेले आहे. २०१६ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सत्तार हे कॅबिनेट मंत्रीपदी राहिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय सुद्धा मिळवला. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेल्या आमदारांपैकी एकमेव मुस्लीम आमदार म्हणून सत्तार ठरले आहेत. त्यामुळे मंत्रीपद मिळण्याचा दावा सत्तार यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

कोण आहेत संजय शिरसाठ

औरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व संजय शिरसाठ करतात. २००९ पासून त्यांची आपल्या मतदारसंघावर पकड असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजय मिळवत हॅटट्रिक साधली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोण आहेत संदीपान भुमरे

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलेले संदीपान भुमरेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा निवडून येणारे ते सद्याच्या उमेदवारांमध्ये एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मंत्रीपदावर त्यांचा नैसर्गिक अधिकार असल्याचा दावा भुमरे समर्थकांकडून करण्यात येत आहे.