शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना संमेलनाला जाऊ नका असा फोन कोणी केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 18:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला वैचारिक वादळ उठले आहे.

उस्मानाबाद : येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कविवर्य  ना.धों. महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा फोन आला होता़ परंतु, महानोर संमेलनास उपस्थित राहणार आहेत असं सांगण्यात येत आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला वैचारिक वादळ उठले आहे. संमेलनाचे उद्घाटक महानोर यांनी संमेलनास उपस्थित राहू नये, अशा आशयाचा संदेश फोनवरुन त्यांना देण्यात आला आहे. यासंदर्भात महानोर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचे नातू शशिकांत म्हणाले, होय, फोन आला होता, तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, महानोर ठरल्याप्रमाणे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

१० जानेवारीला सुरु होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे तसेच महानोर यांनी अनुपस्थित रहावे, असे आवाहनही आम्ही केले आहे, असा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असून मराठी साहित्यात दिब्रिटो त्यांचे काम नाही असा आरोप करण्यात येत असून अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड थांबवावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांतर्फे करण्यात येत होती. मराठी साहित्यात अनेक मोठे साहित्यिक असताना दिब्रिटो यांच्यासारख्या धर्मांध व्यक्तीला असे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देणे चुकीचे आहे अशी नाराजी काहींनी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन