शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:09 IST

अहमदनगरच्या नेवासा इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते.

अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यापासून राज्यभर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी जालनातील अंतरवाली सराटी येथे ते उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला राज्यभरात पाठिंबा मिळाला आणि पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई नव्याने सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात मराठा युवकांमध्ये आहेत. कुणी त्यांचे चित्र काढतंय तर कुणी दिवाळीत रांगोळी काढतंय. पण अहमदनगरच्या आजच्या सभेत चक्क मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या चेहऱ्याने अनेकांना थक्क केले. 

अहमदनगरच्या नेवासा इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते. त्यावेळी नेवासातील एक व्यक्ती सभास्थळी आला. सुरुवातीला त्याला पाहून मनोज जरांगे पाटीलच आल्याचा भास आंदोलकांना झाला. परंतु ही व्यक्ती मनोज जरांगे पाटील नव्हती तर मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी याठिकाणी आली होती. या व्यक्तीचे नाव रामेश्वर धोंगडे असं आहे. ते धनगर समाजातील असून मराठा आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा देण्यासाठी ते आज सभास्थळी आले होते. धोंगडे यांना पाहून सभास्थळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अनेकांनी रामेश्वर धोंगडे यांच्यासोबत फोटोही काढले. 

याबाबत माध्यमांशी रामेश्वर धोंगडे म्हणाले की, मला खूप अनुभव आले. मी धनगर समाजाचा असलो तरी मराठा समाजाच्या या लढाईत मीदेखील उतरलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही धनगर समाजाचीही भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसत असल्याने जिथे जाईल तिथे माझ्यासोबत फोटो घेतात. २ दिवसांपूर्वी मी पंढरपूर येथे गेलो होतो. तेव्हा एका वयोवृद्ध शेतकऱ्यांना माझे पाय पकडून दर्शन घेतले असा अनुभव आल्याचा किस्सा त्यांनी ऐकवला. जोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. जरांगे पाटील यांना भेटण्याची खूप इच्छा होती. आजपर्यंत मी भेटलो नाही. आरक्षणाचा लढा थांबणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा भुजबळांना सरकारने पाठबळ दिले असावे किंवा भुजबळांना भाजपाकडून ऑफर आली असावी. गृहमंत्रीही काही बोलत नाहीत. भुजबळांना थांबवतही नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारायच्या सरकारने ठरवलंय का अशी शंका आमच्या मनात आली आहे. भुजबळांना पलट्या मारायची सवय आहे. मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करण्यासाठी सरकारने त्यांना फूस लावली आहे का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण