शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:13 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणात मला कसं अडकवण्यात आले, त्यानंतर कसे टॉर्चर केले हे कोर्टाला सांगितले होते

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा अखेर १७ वर्षांनी निकाल आला आहे. या खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यात लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही समावेश आहे.  मालेगावच्या भिखू चौकात झालेल्या स्फोटामुळे १०० हून अधिक निष्पाप जखमी झाले होते तर ६ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या आरोपात कर्नल पुरोहित ९ वर्ष जेलमध्ये होते. २०१७ साली सुप्रीम कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला होता. राजकारणामुळे पुरोहितांना अडकवण्यात आले, ज्यामुळे त्यांना ९ वर्ष जेलमध्ये राहावे लागले असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने तेव्हा नोंदवले होते.

कोण आहेत कर्नल पुरोहित?

कर्नल पुरोहित यांचे वडील एक बँक अधिकारी होते. पुण्यात जन्मलेले कर्नल पुरोहित यांचे शालेय शिक्षण अभिनव विद्यालयात झाले तर गरवारेमधून त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केले. १९९४ साली मराठा लाइट इन्फ्रेंट्रीमध्ये त्यांना स्थान मिळाले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मिलिट्रीच्या इंटेलिजेंस विभागात शिफ्ट केले. २००२ ते २००५ या काळात दहशतवाद विरोधी ऑपरेशनसाठी त्यांना एमआय २५ इंटेलिजेंस फिल्ड सिक्युरिटी यूनिटमध्ये तैनात केले. नाशिकमधील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्या ते संपर्कात आले. मालेगाव स्फोटातील आरोपी असलेले उपाध्याय यांनी अभिनव भारत ही संघटना बनवली होती. त्यात पुरोहित सहभागी झाले होते. मालेगाव स्फोटाचा आरोप याच हिंदुत्ववादी संघटना अभिनव भारतवर लावला होता. पुरोहित यांच्यावर सैन्याचे ६० किलो आरडिएक्स चोरणे, अभिनव भारतला फंडिंग करणे आणि संघटनेतील लोकांना ट्रेनिंग देण्याचा आरोप होता. चोरी झालेल्या आरडिएक्सचा काही भाग मालेगाव स्फोटात वापरला होता असं सांगण्यात येते. 

कसं केले होते टॉर्चर?

मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणात मला कसं अडकवण्यात आले, त्यानंतर कसे टॉर्चर केले हे कोर्टाला सांगितले होते. मुंबईतील एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला, डावे गुडघे तोडले. त्याशिवाय एटीएस अधिकाऱ्यांनी माझ्यावर आरएसएस, विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांची आणि गोरखपूरचे तेव्हाचे खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकला होता असं पुरोहित यांनी म्हटलं होते. २९ ऑक्टोबर २००८ साली पुरोहितांना अटक करण्यात आली परंतु एटीएसने त्यांना अटक केल्याचं दाखवले नाही. मुंबईत त्यांना अटक केल्यानंतर खंडाळा येथे बंगल्यात नेण्यात आले. तिथे अनेक बडे अधिकारी उपस्थित होते असं पुरोहित यांनी जबाब नोंदवला होता.

काय घडलं होते?

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावच्या भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. स्फोटात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता. 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालयAnti Terrorist Squadएटीएस