शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 06:52 IST

Parabhani Violence: परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : संविधान प्रास्ताविकेच्या विटंबनेनंतर परभणीतील वातावरण बिघडले असतानाच यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी सत्ताधारी, तसेच विरोधकांनीही केली आहे. संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणारा आरोपी पकडला गेला आहे. मात्र, त्याच्या मागे कोण आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत याप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच, सरकारने जनतेला आश्वासित करावे की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, अशी मागणी करत संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.  

‘...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील’nपरभणीत समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय संविधानाची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.nपुढील २४ तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.nआतापर्यंत केवळ एका समाजकंटकाला अटक केली आहे, मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे आंबेडकर यांनी समाजमाध्यमावर आपली भूमिका मांडताना म्हटले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी