शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:49 IST

Devendra Fadnavis santosh deshmukh sarpanch: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. पहिल्याच दिवशी विधानसभेबरोबर विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित करत यावर सरकारने भूमिका मांडण्याची मागणी केली. दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. 

अंबादास दानवे काय म्हणाले?

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्यांना पोलीस जर सहकार्य करत असतील, तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं याबद्दलचा खुलासा झाला पाहिजे", अशी भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली. 

कोणावर कारवाई केली? देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बीड जिल्ह्यात मस्साजोगला जी काही घटना झालीये, ती गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला. निश्चित ही घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात तिथल्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे." 

"त्यावेळी जो पदभार असलेला पोलीस निरीक्षक आहे, त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. तीन आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून त्यांनादेखील अटक करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.  

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी-एसआयटीकडे

"मी विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की, आरोपी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, धर्माचा; कुठली भाषा बोलतो. कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेत सहभागी असेल, अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरिताच हे प्रकरण सीआयडी क्राईमकडे पाठवण्यात आली आहे. तिथे एक विशेष एसआयटी तयार करायला सांगितली आहे. त्या एसआयटीमार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कुणी असतील, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. 

"या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरदेखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला वाटतं की, सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही दबाब आरोपीला वाचवा, असा आलेला नाही. आम्ही यामध्ये टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

ज्या पोलिसांनी कामचुकारपणा केला, जाणीवपूर्वक केलं असेल, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आणखी कोणी यात सापडला, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल", असे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडCrime Newsगुन्हेगारीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवे