शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:49 IST

Devendra Fadnavis santosh deshmukh sarpanch: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. पहिल्याच दिवशी विधानसभेबरोबर विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित करत यावर सरकारने भूमिका मांडण्याची मागणी केली. दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. 

अंबादास दानवे काय म्हणाले?

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्यांना पोलीस जर सहकार्य करत असतील, तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं याबद्दलचा खुलासा झाला पाहिजे", अशी भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली. 

कोणावर कारवाई केली? देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बीड जिल्ह्यात मस्साजोगला जी काही घटना झालीये, ती गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला. निश्चित ही घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात तिथल्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे." 

"त्यावेळी जो पदभार असलेला पोलीस निरीक्षक आहे, त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. तीन आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून त्यांनादेखील अटक करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.  

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी-एसआयटीकडे

"मी विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की, आरोपी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, धर्माचा; कुठली भाषा बोलतो. कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेत सहभागी असेल, अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरिताच हे प्रकरण सीआयडी क्राईमकडे पाठवण्यात आली आहे. तिथे एक विशेष एसआयटी तयार करायला सांगितली आहे. त्या एसआयटीमार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कुणी असतील, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. 

"या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरदेखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला वाटतं की, सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही दबाब आरोपीला वाचवा, असा आलेला नाही. आम्ही यामध्ये टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

ज्या पोलिसांनी कामचुकारपणा केला, जाणीवपूर्वक केलं असेल, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आणखी कोणी यात सापडला, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल", असे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडCrime Newsगुन्हेगारीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवे