शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

... तर ३० हजार अधिका-यांवर पदावनत होण्याची वेळ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 18:37 IST

राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील, याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.केवळ नोकरी लागेपर्यंत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सेवेतील सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाला ब्रेक लावला असून, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शासनाच्या बाजूने लागण्याची शक्यता धूसर दिसत असल्याने राज्य शासनाने जानेवारीमध्ये आदेश जारी करून राज्य सेवेतील १ ते ४ च्या अधिकारी व कर्मचाºयांची माहिती मागताना सन २००४ पासून शासन सेवेतील सर्व विभागातील कर्मचा-यांना जातीच्या आरक्षणानंतर बढती दिलेल्या अशा अधिकारी आणि कर्मचाºयांची बारीकसारीक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. कारण कोणत्याही वेळी निकाल विरोधात गेल्यास पूर्वतयारी म्हणून शासनाने त्यानुसार अधिकारी, कर्मचा-यांची माहिती मिळविण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले आहे. जवळपास ३० हजार अधिका-यांना उच्च पदावरून खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. 

२०१४ पासून बसणार फटकानोकरीमध्ये जातीय आधारावर दिलेल्या पदोन्नतीतील ३० हजार अधिकारी व कर्मचारी हे अलिकडे दिलेल्या ३ ते ४ वर्षांतील पदोन्नत असून सर्वाधिक फटका त्यांना बसणार आहे. कारण २००४ पासून नोकरीतील पदोन्नती उच्च न्यायालयाने नाकारली असली तरी २००४ ते २०१४ पर्यंत अनेक अधिकारी हे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र ठरतील. मात्र, २०१४ पासून प्रमोशन घेतलेल्यांना खालच्या पदावर येण्याची शक्यता आहे.

शासनाची पदोन्नती प्रक्रिया रेंगाळतउच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिल्यानंतर शासन सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हापासून राज्य सेवेतील पदोन्नतीचा बोजवारा उडाला असताना डिसेंबर २०१७ मध्ये शासनाने आदेश जारी करून सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्यास सुरूवात केलेली असली तरी अनेक विभागात पदोन्नतीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अनेक विभागात डीपीसीसुद्धा झालेली नाही.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय