शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

... तर ३० हजार अधिका-यांवर पदावनत होण्याची वेळ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 18:37 IST

राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील, याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.केवळ नोकरी लागेपर्यंत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सेवेतील सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाला ब्रेक लावला असून, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शासनाच्या बाजूने लागण्याची शक्यता धूसर दिसत असल्याने राज्य शासनाने जानेवारीमध्ये आदेश जारी करून राज्य सेवेतील १ ते ४ च्या अधिकारी व कर्मचाºयांची माहिती मागताना सन २००४ पासून शासन सेवेतील सर्व विभागातील कर्मचा-यांना जातीच्या आरक्षणानंतर बढती दिलेल्या अशा अधिकारी आणि कर्मचाºयांची बारीकसारीक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. कारण कोणत्याही वेळी निकाल विरोधात गेल्यास पूर्वतयारी म्हणून शासनाने त्यानुसार अधिकारी, कर्मचा-यांची माहिती मिळविण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले आहे. जवळपास ३० हजार अधिका-यांना उच्च पदावरून खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. 

२०१४ पासून बसणार फटकानोकरीमध्ये जातीय आधारावर दिलेल्या पदोन्नतीतील ३० हजार अधिकारी व कर्मचारी हे अलिकडे दिलेल्या ३ ते ४ वर्षांतील पदोन्नत असून सर्वाधिक फटका त्यांना बसणार आहे. कारण २००४ पासून नोकरीतील पदोन्नती उच्च न्यायालयाने नाकारली असली तरी २००४ ते २०१४ पर्यंत अनेक अधिकारी हे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र ठरतील. मात्र, २०१४ पासून प्रमोशन घेतलेल्यांना खालच्या पदावर येण्याची शक्यता आहे.

शासनाची पदोन्नती प्रक्रिया रेंगाळतउच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिल्यानंतर शासन सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हापासून राज्य सेवेतील पदोन्नतीचा बोजवारा उडाला असताना डिसेंबर २०१७ मध्ये शासनाने आदेश जारी करून सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्यास सुरूवात केलेली असली तरी अनेक विभागात पदोन्नतीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अनेक विभागात डीपीसीसुद्धा झालेली नाही.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय