शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

... तर ३० हजार अधिका-यांवर पदावनत होण्याची वेळ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 18:37 IST

राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील, याची चाचपणी शासनाने सुरू केलेली आहे.केवळ नोकरी लागेपर्यंत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सेवेतील सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाला ब्रेक लावला असून, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शासनाच्या बाजूने लागण्याची शक्यता धूसर दिसत असल्याने राज्य शासनाने जानेवारीमध्ये आदेश जारी करून राज्य सेवेतील १ ते ४ च्या अधिकारी व कर्मचाºयांची माहिती मागताना सन २००४ पासून शासन सेवेतील सर्व विभागातील कर्मचा-यांना जातीच्या आरक्षणानंतर बढती दिलेल्या अशा अधिकारी आणि कर्मचाºयांची बारीकसारीक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. कारण कोणत्याही वेळी निकाल विरोधात गेल्यास पूर्वतयारी म्हणून शासनाने त्यानुसार अधिकारी, कर्मचा-यांची माहिती मिळविण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले आहे. जवळपास ३० हजार अधिका-यांना उच्च पदावरून खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. 

२०१४ पासून बसणार फटकानोकरीमध्ये जातीय आधारावर दिलेल्या पदोन्नतीतील ३० हजार अधिकारी व कर्मचारी हे अलिकडे दिलेल्या ३ ते ४ वर्षांतील पदोन्नत असून सर्वाधिक फटका त्यांना बसणार आहे. कारण २००४ पासून नोकरीतील पदोन्नती उच्च न्यायालयाने नाकारली असली तरी २००४ ते २०१४ पर्यंत अनेक अधिकारी हे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र ठरतील. मात्र, २०१४ पासून प्रमोशन घेतलेल्यांना खालच्या पदावर येण्याची शक्यता आहे.

शासनाची पदोन्नती प्रक्रिया रेंगाळतउच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिल्यानंतर शासन सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हापासून राज्य सेवेतील पदोन्नतीचा बोजवारा उडाला असताना डिसेंबर २०१७ मध्ये शासनाने आदेश जारी करून सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्यास सुरूवात केलेली असली तरी अनेक विभागात पदोन्नतीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अनेक विभागात डीपीसीसुद्धा झालेली नाही.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय