शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:48 IST

संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले.

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार अध्यक्ष आहेत, महाराष्ट्रात जयंत पाटील अध्यक्ष आहेत. २४ वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून केला आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षातच आहोत असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. अजित पवार आमचेच नेते या विधानावरून राज्याच्या राजकारणात जी संभ्रमावस्था झालीय त्यावर सुळेंनी भाष्य केले.

अजित पवार कुठल्या पक्षाचे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षातील ९ आमदार आणि २ खासदार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. जो आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारा नाही. त्यावर आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. पक्षाच्या विचारधारेच्या चौकटीत तो निर्णय बसत नाही हे आम्ही कळवले आहे. इतकी पारदर्शक भूमिका आम्ही घेतली आहे. संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले.

त्याचसोबत अजित पवारांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. वेगवेगळ्या पक्षात असले तरी कामाच्या पद्धतीवरून नेतृत्व मान्य केले जाते. पहिल्या सभेत अनेक नेते विरोधात बोलले. त्यांच्या टीकेचं वाईट वाटले. त्यानंतर बऱ्याच गोष्टीचे स्पष्टीकरण आले आहे. त्याच त्याच गोष्टी बोलून महागाई, बेरोजगारी कमी होणार नाही. कांद्याला भाव मिळणार नाही. दुष्काळ तातडीने जाहीर झाला पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी सातत्याने आम्ही करतोय असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, मी अनेक भाषणात सरकारच्या विरोधात बोलतेय, त्यामुळे माझ्याबद्दल कुणाच्या मनात संभ्रम नसेल. माझी लढाई वैयक्तिक नाही पण धोरणे, निर्णय यांच्याविरोधात माझी लढाई आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी ज्यारितीने त्यांच्या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री जपानमधून ट्विट करतात तर दुसरे मंत्री दिल्लीत भेट घेतात त्यांनाच काही माहिती नसते. केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकार यांच्यात संवाद नाही. जपानमधून उपमुख्यमंत्री माहिती देतात ती राज्यातल्या कृषीमंत्री यांना माहिती नसते असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे