शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:48 IST

संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले.

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार अध्यक्ष आहेत, महाराष्ट्रात जयंत पाटील अध्यक्ष आहेत. २४ वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून केला आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षातच आहोत असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. अजित पवार आमचेच नेते या विधानावरून राज्याच्या राजकारणात जी संभ्रमावस्था झालीय त्यावर सुळेंनी भाष्य केले.

अजित पवार कुठल्या पक्षाचे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षातील ९ आमदार आणि २ खासदार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. जो आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारा नाही. त्यावर आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. पक्षाच्या विचारधारेच्या चौकटीत तो निर्णय बसत नाही हे आम्ही कळवले आहे. इतकी पारदर्शक भूमिका आम्ही घेतली आहे. संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले.

त्याचसोबत अजित पवारांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. वेगवेगळ्या पक्षात असले तरी कामाच्या पद्धतीवरून नेतृत्व मान्य केले जाते. पहिल्या सभेत अनेक नेते विरोधात बोलले. त्यांच्या टीकेचं वाईट वाटले. त्यानंतर बऱ्याच गोष्टीचे स्पष्टीकरण आले आहे. त्याच त्याच गोष्टी बोलून महागाई, बेरोजगारी कमी होणार नाही. कांद्याला भाव मिळणार नाही. दुष्काळ तातडीने जाहीर झाला पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी सातत्याने आम्ही करतोय असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, मी अनेक भाषणात सरकारच्या विरोधात बोलतेय, त्यामुळे माझ्याबद्दल कुणाच्या मनात संभ्रम नसेल. माझी लढाई वैयक्तिक नाही पण धोरणे, निर्णय यांच्याविरोधात माझी लढाई आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी ज्यारितीने त्यांच्या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री जपानमधून ट्विट करतात तर दुसरे मंत्री दिल्लीत भेट घेतात त्यांनाच काही माहिती नसते. केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकार यांच्यात संवाद नाही. जपानमधून उपमुख्यमंत्री माहिती देतात ती राज्यातल्या कृषीमंत्री यांना माहिती नसते असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे