शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधानसभेला तिकीट मिळणार की नाही, याचीही खडसेंना धास्ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 14:10 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्ह्यात वाढलेले वजन आणि खडसे यांची झालेली पिछेहाट जळगावमध्ये चर्चेचा विषय आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक दिवसांपासून सत्तेपासून बेदखल आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर खडसे यांचा मंत्रीपदासाठी पुन्हा विचार झाला नाही. आता खडसे यांनीही आस सोडून दिली की काय, असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

खडसे म्हणाले की, तिकीट मिळणार की नाही, हेही आपल्याला ठावूक नाही. तसेच जनता आपल्या पाठिशी असल्याचे नमूद केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना सपशेल डावण्यात येते की, काय अशी चर्चा जळगावमध्ये सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खडसेंना स्थान मिळणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, भाजपने बाहेरून आलेल्यांना मंत्रीपद दिले. त्यामुळे खडसेंना पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा होती. दरम्यान आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. परंतु, या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार की नाही, इथपर्यंत खडसेंना धास्ती असल्याचे दिसून येते. पक्ष तिकीट देओ न देओ जनता आपल्या पाठिशी असल्याचं खडसेंनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. यामुळे खडसेंना विधासनसभा निवडणुकीत भाजपकडून धक्का मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील संघर्षात महाजनांचीच सरशी

जळगाव जिल्ह्यातील खडसे-महाजन यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जिल्ह्यात वाढलेले वजन आणि खडसे यांची झालेली पिछेहाट जळगावमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यातच मंत्रीमंडळ विस्तारातही खडसेंना स्थान मिळाले नसल्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्व महाजनांच्याच बाजूने असल्याचे दिसून येते.