शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

भाजपासोबत जिथं युती होणार नाही, तिथं...; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:14 IST

ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला काम केले आहे. त्यांनाही स्थान देणे आवश्यक असते असं गोऱ्हे यांनी सांगितले. 

पुणे - मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाशिवसेना युती व्हावी असा आमचा प्रयत्न असणार आहे. इतर सर्व महापालिका निवडणुकीत युती व्हावी असं आम्हाला वाटतं. परंतु ज्याठिकाणी काही कारणास्तव युती होणार नाही तिथे शिवसेनेचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे असं मोठं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. 

पुण्यात पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, युतीत बिघाडी वैगेरे काही नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. मी पाचवी सहावी निवडणूक बघतेय. तरुणांची पिढी आता समोर आली आहे. ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला काम केले आहे. त्यांनाही स्थान देणे आवश्यक असते. प्रत्येक क्षेत्रात तरुण पिढी येत असते. त्यामुळे तरूण पिढीला येताच कामा नये असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी सांगितले.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर बसविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. पक्ष नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्याशिवाय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. मनपा निवडणूक स्वबळावर लढविणार असून, एक नंबरचा पक्ष म्हणून सगळ्यात जास्त नगरसेवक भाजप निवडून आणेल, त्यासाठी नियोजन सुरू आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवकच महापौर बनेल असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्ते अस्वस्थ...

‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. २०१९ पासून आजपर्यंत कार्यकर्त्यांनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सामना केला. शिंदेसेना सोबत आल्यानंतर सत्ता मिळाली, पण त्यात कार्यकर्त्यांचे काही भले झाले नाही. मंत्री, नेत्यांच्या मागे-मागे फिरणाऱ्यांचे अडीच वर्षांत कल्याण झाले. राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत आल्यानंतरही कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. आता सत्ता आल्यामुळे काही भले होईल, या अपेक्षेत कार्यकर्ते असतानाच ठाकरेंशी हातमिळवणीची चर्चा, नवीन पक्षप्रवेशांमुळे ते पुन्हा खचले आहेत. पक्ष प्रत्येक कार्यक्रम ‘टार्गेट’ देऊन पूर्ण करून घेतो, मात्र त्या तुलनेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ‘आउटपूट’ मिळत नसल्याची भावना अनेकांनी बोलवून दाखविली.  

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा