शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जलयुक्त शिवारचा २० हजार कोटींचा निधी गेला कुठे? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 01:17 IST

जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला, याची आडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.

नागपूर : राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला असताना राज्यातील २२ जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई व गुरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व बोरवेल आटल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दीड ते दोन हजार फुटावर गेली आहे. मग शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केलेला निधी गेला कुठे, असा सवाल विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केला. तसेच जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला, याची आडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.विदर्भातील दुष्काळग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ अमरावती व नागपूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. सोमवारपासून या दौºयाला सुरुवात केली आहे. दौºयावर रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार ‘लोकमत’शी बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातील ८५ टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत. जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.काँग्रेसचे पथक पाहणी दौ-यावरराज्यात सध्या भीषण दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पथक दुष्काळी भागात गेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार हे दुष्काळी पाहणी दौरे सुरु करण्यात आले आहेत. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सोमवारपासून हे पाहणी दौरे सुरु झाले, तर मंगळवारपासून इतर विभागात काँग्रेसचे पथक दौºयावर जात आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार