शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 09:24 IST

भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते असं अंधारेंनी म्हटलं.

पुणे - जे नवखे असतात त्यांना तयारी करावी लागते. शिवसेना गेली ५५ वर्ष दसरा मेळावा घेतेय. ही परंपरा आहे. त्यामुळे आम्हाला त्याची तयारी करावी लागत नाही. दुसरे इव्हेंट साजरा करत असतील. शिवसेनेने स्वत:ला सिद्ध केले आहे. दसरा मेळाव्याला परंपरा आहे इव्हेंट नाही. दरवर्षी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला येतात. गर्दी जमवणे म्हणजे यशस्वी होणे असं होत नाही. प्रत्येकाला १ हजार रुपये देणे, खाण्याची सोय करणे, १४०० बसेस आणणे त्यासाठी १० कोटी खर्च करणे हे पैसे कुठून आले? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला विचारला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला गर्दी जमवण्यासाठी इतकं करावं लागत नाही. शिवसैनिक स्वत:ची पदरमोड करून मेळाव्याला येतो. त्याला वातानुकुलनित बसेसची गरज पडत नाही. दसरा मेळावा एकच आहे. शिंदेंचा इव्हेंट होऊ शकतो. जे भाजपाच्या पैशावर गुवाहाटी फिरून आले. भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते. गेली २ वर्ष दसरा मेळावा झाला मग तेव्हा या लोकांनी का सोडलं नाही? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच खोके दिल्यावर हिंदुत्वाचा साक्षात्कार झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मेळाव्यात येतील की नाही माहिती नाही. परंतु महाराष्ट्रातल्या पुरोगामी संघटना, चळवळी ज्याला उद्धव ठाकरेंचे संयमी नेतृत्व आवडलंय. ज्याला भाजपाचा राग, शिंदे गटाची चीड आहे तो मेळाव्याला येईल. संविधानाची चौकट अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व आहे. केवळ शिवसैनिक नाही तर ज्याला उद्धव ठाकरेंचे विचार पटले आहेत तो मेळाव्याला उपस्थित राहील असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. 

नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंयभाजपाची स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचणार आहेत. कागद समोर घेऊन बाळासाहेबांनी भाषण केले नव्हते. एकनाथ शिंदे कागद समोर ठेऊन भाषण करतात. नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळत असून त्यांची काळजी वाटते. जे हिंदुत्व राणेंचे आता जागे झाले ते १० वर्ष सोनिया गांधींकडे सरेंडर करून कुठल्या खुर्चीला टांगून ठेवले होते असा सवाल सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंना केला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे