शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:55 IST

सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही.

मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेताना, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? आहेत. असा प्रश्न उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून दुसऱ्या टप्यातील ‘शिवस्वराज्य यात्रा' आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, बालानगर येथे आज दुसऱ्या टप्यातील पहिली सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. माहिती अधिकाराचा कायदा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात करण्यात आला. मात्र आता या सरकराने या कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात आंदोलन करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता कुठे आहेत. असा सवाल पवार यांनी  यावेळी उपस्थित केला.

सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही. माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आता तोच कायदा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वापरला जाणार आहे. पण आता अण्णा यावर काहीच का बोलत नाही? असेही अजित पवार म्हणाले.