शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:55 IST

सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही.

मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेताना, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? आहेत. असा प्रश्न उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून दुसऱ्या टप्यातील ‘शिवस्वराज्य यात्रा' आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, बालानगर येथे आज दुसऱ्या टप्यातील पहिली सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. माहिती अधिकाराचा कायदा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात करण्यात आला. मात्र आता या सरकराने या कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात आंदोलन करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता कुठे आहेत. असा सवाल पवार यांनी  यावेळी उपस्थित केला.

सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही. माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आता तोच कायदा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वापरला जाणार आहे. पण आता अण्णा यावर काहीच का बोलत नाही? असेही अजित पवार म्हणाले.