शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:38 IST

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. - राज ठाकरे

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपल्याकडची महानंदा डेअरी जातेय का राहतेय याची कल्पना नाही. ती अमूल गिळंकृत करतेय का असा प्रश्न पडलाय अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. सहकार चळवळ ज्योतिराव फुले यांनी चालू केली होती. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती अशी आहे की विहीरीला ८०० ते ९०० फुट पाणी लागत नाहीय. राजकीय स्वार्थासाठी तिथे साखर कारखाने उभे केले जातायत. म्हणजे तुम्ही ऊस लावणार. त्याला सर्वात जास्त पाणी लागते. नॅशनल जिओग्राफीने सांगितलेय की असेच सुरु राहिले तर मराठवाड्याचे ४०-५० वर्षांत वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. महाराष्ट्राची जमिन बरबाद होतेय याची कल्पना नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले. 

आज आम्ही आमच्यातच भांडतोय. जातीमध्ये भांडतोय. काय चालुय? हे चालू नाहीय, हे चालविले जातेय. महाराष्ट्र एक राहू नये, एकसंध राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्षे ओरडून सांगतोय. तुमच्या घराच्या जमिनीचा तुकडा आहे हे तुमचे अस्तित्व आहे. जगात जेवढी युद्धे झाली त्याला इतिहास म्हणतो, तो इतिहास भुगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भुगोल म्हणजे जमिन. महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, तेव्हा कळायचे तरी जमिनी घ्यायला आलेत. आता राजकारणी एवढ्या शांतपणे जमिनी घेतायत उद्या तुमचे काहीही अस्तित्व राहणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.

आज मी रायगड जिल्ह्यात उभा आहे. शिवडी-न्हावा शेवा पूल झालाय, ज्या ज्या वेळेला असे रस्ते निर्माण झाले तेव्हा आपल्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या हातातून जाणार आहे. विमानतळ येतोय. बाहेरच्या राज्यातील लोक विकत घेणार इथली जागा. हळूहळू तुम्ही वेगळीच भाषा बोलायला लागणार. कारण ते तुमच्याशी मराठीत बोलणार नाहीत. रायगड जिल्ह्याला माझा निर्वाणीचा इशारा आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सावध केले आहे. 

आम्ही जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. कशाला शिवाजी महाराजांना हारतुरे घालता. त्यांनी जे विचार सांगितले ते पाळत नसू तर काय उपयोग. त्यांनी सांगितलेले समुद्रमार्गे शत्रू येईल. कसाब, आरडीएक्स समुद्र मार्गेच आले. आमचे लक्ष नाही. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्र तोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. पालघर ते ठाणे जिल्ह्यातला पट्टा हा कोकण पट्टा कधीच हातातून गेलाय. आता रायगडही जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे