शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:38 IST

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. - राज ठाकरे

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपल्याकडची महानंदा डेअरी जातेय का राहतेय याची कल्पना नाही. ती अमूल गिळंकृत करतेय का असा प्रश्न पडलाय अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. सहकार चळवळ ज्योतिराव फुले यांनी चालू केली होती. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती अशी आहे की विहीरीला ८०० ते ९०० फुट पाणी लागत नाहीय. राजकीय स्वार्थासाठी तिथे साखर कारखाने उभे केले जातायत. म्हणजे तुम्ही ऊस लावणार. त्याला सर्वात जास्त पाणी लागते. नॅशनल जिओग्राफीने सांगितलेय की असेच सुरु राहिले तर मराठवाड्याचे ४०-५० वर्षांत वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. महाराष्ट्राची जमिन बरबाद होतेय याची कल्पना नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले. 

आज आम्ही आमच्यातच भांडतोय. जातीमध्ये भांडतोय. काय चालुय? हे चालू नाहीय, हे चालविले जातेय. महाराष्ट्र एक राहू नये, एकसंध राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्षे ओरडून सांगतोय. तुमच्या घराच्या जमिनीचा तुकडा आहे हे तुमचे अस्तित्व आहे. जगात जेवढी युद्धे झाली त्याला इतिहास म्हणतो, तो इतिहास भुगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भुगोल म्हणजे जमिन. महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, तेव्हा कळायचे तरी जमिनी घ्यायला आलेत. आता राजकारणी एवढ्या शांतपणे जमिनी घेतायत उद्या तुमचे काहीही अस्तित्व राहणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.

आज मी रायगड जिल्ह्यात उभा आहे. शिवडी-न्हावा शेवा पूल झालाय, ज्या ज्या वेळेला असे रस्ते निर्माण झाले तेव्हा आपल्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या हातातून जाणार आहे. विमानतळ येतोय. बाहेरच्या राज्यातील लोक विकत घेणार इथली जागा. हळूहळू तुम्ही वेगळीच भाषा बोलायला लागणार. कारण ते तुमच्याशी मराठीत बोलणार नाहीत. रायगड जिल्ह्याला माझा निर्वाणीचा इशारा आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सावध केले आहे. 

आम्ही जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. कशाला शिवाजी महाराजांना हारतुरे घालता. त्यांनी जे विचार सांगितले ते पाळत नसू तर काय उपयोग. त्यांनी सांगितलेले समुद्रमार्गे शत्रू येईल. कसाब, आरडीएक्स समुद्र मार्गेच आले. आमचे लक्ष नाही. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्र तोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. पालघर ते ठाणे जिल्ह्यातला पट्टा हा कोकण पट्टा कधीच हातातून गेलाय. आता रायगडही जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे