शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:38 IST

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. - राज ठाकरे

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपल्याकडची महानंदा डेअरी जातेय का राहतेय याची कल्पना नाही. ती अमूल गिळंकृत करतेय का असा प्रश्न पडलाय अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. सहकार चळवळ ज्योतिराव फुले यांनी चालू केली होती. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती अशी आहे की विहीरीला ८०० ते ९०० फुट पाणी लागत नाहीय. राजकीय स्वार्थासाठी तिथे साखर कारखाने उभे केले जातायत. म्हणजे तुम्ही ऊस लावणार. त्याला सर्वात जास्त पाणी लागते. नॅशनल जिओग्राफीने सांगितलेय की असेच सुरु राहिले तर मराठवाड्याचे ४०-५० वर्षांत वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. महाराष्ट्राची जमिन बरबाद होतेय याची कल्पना नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले. 

आज आम्ही आमच्यातच भांडतोय. जातीमध्ये भांडतोय. काय चालुय? हे चालू नाहीय, हे चालविले जातेय. महाराष्ट्र एक राहू नये, एकसंध राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्षे ओरडून सांगतोय. तुमच्या घराच्या जमिनीचा तुकडा आहे हे तुमचे अस्तित्व आहे. जगात जेवढी युद्धे झाली त्याला इतिहास म्हणतो, तो इतिहास भुगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भुगोल म्हणजे जमिन. महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, तेव्हा कळायचे तरी जमिनी घ्यायला आलेत. आता राजकारणी एवढ्या शांतपणे जमिनी घेतायत उद्या तुमचे काहीही अस्तित्व राहणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.

आज मी रायगड जिल्ह्यात उभा आहे. शिवडी-न्हावा शेवा पूल झालाय, ज्या ज्या वेळेला असे रस्ते निर्माण झाले तेव्हा आपल्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या हातातून जाणार आहे. विमानतळ येतोय. बाहेरच्या राज्यातील लोक विकत घेणार इथली जागा. हळूहळू तुम्ही वेगळीच भाषा बोलायला लागणार. कारण ते तुमच्याशी मराठीत बोलणार नाहीत. रायगड जिल्ह्याला माझा निर्वाणीचा इशारा आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सावध केले आहे. 

आम्ही जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. कशाला शिवाजी महाराजांना हारतुरे घालता. त्यांनी जे विचार सांगितले ते पाळत नसू तर काय उपयोग. त्यांनी सांगितलेले समुद्रमार्गे शत्रू येईल. कसाब, आरडीएक्स समुद्र मार्गेच आले. आमचे लक्ष नाही. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्र तोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. पालघर ते ठाणे जिल्ह्यातला पट्टा हा कोकण पट्टा कधीच हातातून गेलाय. आता रायगडही जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे