शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नुसती घोषणाच; महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज, यशवंत चव्हाणांचा पुतळा कधी बदलणार?

By समीर देशपांडे | Updated: February 8, 2025 15:51 IST

कोल्हापूर विमानतळाला नाव कधी देणार?

समीर देशपांडेकोल्हापूर : नवी दिल्लीतीलमहाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत पुतळे बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात करून बरोबर सात महिने उलटले. विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा सत्ता आली तरी याबाबतीत राज्य शासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही.या पुतळ्यांबरोबरच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेली २० वर्षे होत आहे. असे असताना पुतळे बदलले का जात नाहीत आणि विमानतळाला नाव का दिले जात नाही? असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.महाराष्ट्र सदनातील लोकराजा शाहू आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे दोन्ही पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत आहेत, असे वृत्त ‘लोकमत’ने ४ आणि ५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केले. यानंतर याबाबत कोल्हापुरातील मान्यवरांनी आणि संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.भाजप आणि जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठवून शासनाला पुतळा बदलणे शक्य नसल्यास कोल्हापूरकर दिल्लीतील हे पुतळे बदलतील, असा इशाराही दिला होता. याची दखल घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ५ जुलै २०२४ रोजी याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.

मंत्री, खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावीया दोन्ही पुतळ्यांबाबत आणि कोल्हापूरच्या विमानतळाबाबत दोन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उठता, बसता शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्या या सर्वांनी तातडीने याबाबत शासनाला निर्णय घेणे भाग पाडून अंमलबजावणी करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली