शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:52 IST

योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्या

कोल्हापूर : केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन कायदा करून नऊ वर्षे होऊनही या कायद्यानुसार राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नाही. हे धोरण कधी निश्चित करणार असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी अधिवेशनात उपस्थित केला.यावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब मान्य करत सध्या राज्याची कचरा संकलनाची टक्केवारी ८९.२४ टक्के इतकी असल्याचे सांगत राज्याचे घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.सतेज पाटील म्हणाले, केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन कायदा करून ९ वर्षे होऊनही या कायद्यानुसार राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नाही. राज्यात २०२१-२२ या कालावधीत ४१ टक्के असंकलित कचऱ्याची नोंद करण्यात आल्याचे महालेखापरीक्षक यांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.कॅगच्या अहवालामुळे घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेबाबत शासन उदासीन आहे. केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केल्यापासून एका वर्षाच्या आत राज्यासाठी घनकचरा धोरण व घनकचरा व्यवस्थापन आखावे असे निर्देश देऊनही शासनाने याप्रकरणी कोणतीच कार्यवाही केली नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.यावर एकनाथ शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वकष सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, राज्याचे घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्याराज्यातील शहरात नवीन रस्ते, नवीन इमारती आणि वसाहती उभ्या राहत असून, शहरी आणि ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याची समस्या निर्माण झाली असल्याचा मुद्दा सतेज पाटील यांनी उपस्थित केला.