शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:52 IST

योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्या

कोल्हापूर : केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन कायदा करून नऊ वर्षे होऊनही या कायद्यानुसार राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नाही. हे धोरण कधी निश्चित करणार असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी अधिवेशनात उपस्थित केला.यावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब मान्य करत सध्या राज्याची कचरा संकलनाची टक्केवारी ८९.२४ टक्के इतकी असल्याचे सांगत राज्याचे घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.सतेज पाटील म्हणाले, केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन कायदा करून ९ वर्षे होऊनही या कायद्यानुसार राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नाही. राज्यात २०२१-२२ या कालावधीत ४१ टक्के असंकलित कचऱ्याची नोंद करण्यात आल्याचे महालेखापरीक्षक यांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.कॅगच्या अहवालामुळे घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेबाबत शासन उदासीन आहे. केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केल्यापासून एका वर्षाच्या आत राज्यासाठी घनकचरा धोरण व घनकचरा व्यवस्थापन आखावे असे निर्देश देऊनही शासनाने याप्रकरणी कोणतीच कार्यवाही केली नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.यावर एकनाथ शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वकष सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, राज्याचे घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्याराज्यातील शहरात नवीन रस्ते, नवीन इमारती आणि वसाहती उभ्या राहत असून, शहरी आणि ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याची समस्या निर्माण झाली असल्याचा मुद्दा सतेज पाटील यांनी उपस्थित केला.