शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Property Tax: आमचा मालमत्ता कर केव्हा रद्द करणार? राज्यभरातून नागरिकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 08:58 IST

मुंबईत ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर ठाण्यात ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव महापालिकेने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर ठाण्यात ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव महापालिकेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून आमचाही मालमत्ता कर केव्हा माफ करणार, असा सवाल केला जात आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या या संबंधात आक्रमक भावना आहेत. आर्थिक चणचणीत कर माफ करण्याची त्यांची मागणी आहे.  ‘लोकमत’ने त्याचा घेतलेला हा आढावा.

५० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन 

पुण्यातही ५००चौरस फुटापर्यंतच्या मिळकत धारकांना महापालिकेने करमाफी द्यावी. सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महापालिकेनी करमाफी द्यावी, अशी मागणी माजी आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केली आहे. पुणे महापालिकेनेही मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसने यापूर्वीच केलेली होती. महापालिकेत कर सवलतीचा ठरावही मांडला, मंजूर झाल्यावर राज्य शासनाकडे पाठविला होता. ५० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, अशी माहिती मोहन जोशी व संजय बालगुडे यांनी दिली.

महापालिकेला अनुदान द्याकोल्हापूर महापालिकेतील उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतात घरफाळा आहे. यामुळे ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा घरफाळा येथे माफ करण्याचा निर्णय घ्यावा. महापालिकेच्या उत्पन्नाला बाधा येऊ नये, म्हणून राज्य सरकारने त्या बदल्यात अनुदान द्यावे, अशी मागणी माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे यांनी केली आहे. 

महापालिका    मालमत्ता कर     (घरटी/रुपये)पुणे    १० ते १२०००नागपूर     ५०० ते ६००औरंगाबाद     २५०० ते ३०००अमरावती     १५००चंद्रपूर     २०००साेलापूर     ४५०० ते ५०००धुळे     २५०० ते २८००नाशिक     ६०० ते ७००जळगाव     ३ ते ४ हजारकल्याण-डोंबिवली    ५०००उल्हासनगर    ७५००भिवंडी    २०००मीरा-भाईंदर    ३०००

मुंबईपेक्षा आम्ही गरीब आहे हो!नीति आयोगाच्या अहवालानुसार मुंबईत फक्त ३.५९ टक्के गरिबी आहे. राज्यात मुंबई श्रीमंत महानगर आहे, त्या तुलनेत औरंगाबादेत १४.८६ टक्के गरिबी आहे. राज्यात गरिबीत जिल्हा २२ व्या क्रमांकावर असताना मुंबईतील मालमत्तांना कर सवलत दिल्याने औरंगाबादेतील गुंठेवारीतील रहिवाशांना मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी पुढे आली आहे.   ४० कोटी भरले : पालिकेकडे आतापर्यंत साडेचार हजार संचिका गुंठेवारी वसाहतींतून दाखल झाल्या असून दोन हजार ३७ संचिका प्रशासनाने मंजूर केल्या. ७८ संचिका नामंजूर केल्या आहेत. पालिकेच्या तिजोरीत ४० कोटी रुपयांचे नियमितीकरण शुल्क व मालमत्ता कर जमा झाला आहे. 

दिलासा देण्याची मागणीशहरातील ६०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली आहे.नागपूर शहरात ६ लाख ५० हजार मालमत्ता आहेत. यात सुमारे ३ लाख मालमत्ता ५०० चौ. फुटांपर्यंतच्या आहेत. यावरील कर माफ करायचा झाल्यास अंदाजे ७० ते ८० कोटी रुपयांचा महसूल मिळणार नाही, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.

फेरमूल्यांकनानंतर वाढला करजळगाव महापालिका प्रशासनाकडून २०१७ ते २०१९ दरम्यान नव्याने फेरमूल्यांकन करण्यात आले. फेरमूल्यांकनात ६६ हजार नागरिकांच्या मालमत्तांमध्ये वाढ झालेली दिसून आली. तर १९ हजार मालमत्ता नव्याने वाढल्या आहेत. यामुळे सद्यस्थितीत महापालिकेकडून नागरिकांना वाढीव कर आकारला जात आहे.

आमच्यावर अन्याय का? मागील दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावावर निर्णय का होत नाही. हा नवी मुंबईकरांवर अन्याय नाही का, असा सवाल माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे. करमाफीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन नवी मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

करप्रणालीलाच विरोध२०१६ साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आहे. मात्र, मालमत्ता करप्रणाली लागू करण्यास झालेल्या उशिरामुळे तसेच प्रशासनाने लागू केलेला मालमत्ता कर अवाजवी असल्याचे सांगत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात या मालमत्ता कर प्रणालीला विरोध होत आहे. सत्ताधारी भाजपने नागरिकांना पाच वर्षे मालमत्ता कराचा बोजा टाकणार नसल्याचे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते. या आश्वासनावर बोट ठेवत पालिका क्षेत्रातील नागरिक मालमत्ता करप्रणालीला विरोध दर्शवत आहेत.मागील पाच वर्षांपासूनच पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला मालमत्ता कर अन्यायकारक असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन पनवेलमधील करदात्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेविका लीना गरड यांनी केली आहे.