शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

By admin | Published: June 24, 2017 4:17 AM

कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मुंबई तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मात्र अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊ स सुरूच न झाल्याने अनेक भागांत पेरण्या रखडल्या आहेत. मृग नक्षत्रात पेरण्या केल्या जातात. पण यंदा मृग संपला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर चांगला पाऊ स झाल्यामुळे आतापर्यंत राज्याच्या ग्रामीण भागांत पाण्याची टंचाई फारशी भासलेली नाही. पण आता तो सुरू झाला नाही, तर जुलैमध्ये ते संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईत ७ ते १0 जून या काळात मान्सूनचे आगमन होते. यंदा आगमन लांबले. सुरुवातीला २ ते ५ जून या काळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तो तेव्हा पडला नाही आणि आताही मुंबईच्या एखाद दुसऱ्या भागात तुरळक सरी पडत असून, संपूर्ण शहरात अद्याप सलग पाऊ स पडलेलाच नाही. कोकणात अडकलेला पाऊ स अद्याप मुंबईकडे आणि राज्याच्या अन्य भागांत हवा तसा सरकलेला नाही. तो कधी सरकेल, याचा स्पष्ट अंदाजही वर्तवण्यात आलेला नाही. राज्यात मध्य महाराष्ट्रातील गेल्या काही भागांमध्ये २४ तासांत तुरळक पाऊस झाला. लोहगाव, अलिबाग, अकोला येथे प्रत्येकी ३ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला. तर, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पारोळा येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस न सुरू झाल्याने शहरी भागाचे तापमान चांगलेच वाढले आहे़ मे महिन्यात होणाऱ्या उकाड्यापेक्षा अधिक उकाडा होत आहे़ त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़. 

 

काही भागांमध्ये पाऊस : कोकणातील माथेरान येथे ७०, पनवेल ६०, पेण, उरण प्रत्येकी ४०, खालपुर, कुडाळ, रोहा, वेंगुर्ला येथे प्रत्येकी ३०, अलिबाग, डहाणू, जव्हार, कणकवली, मंडणगड, मुंबई, मुरबाड, सुधागड, तलासरी, उल्हासनगर येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. भिरा, चिपळूण, देवगड, कल्याण, कर्जत, मालवण, माणगांव, म्हापसा, म्हसळा, राजापूर, देवरुख, सावंतवाडी आणि वाडा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथा क्षेत्रातील शिरगाव येथे ६०, ताम्हिणी ५०, दावडी ४०, डुंगरवाडी, आंबोणे ३०, लोणावळा, वळवण, भिवपुरी, खोपोली येथे प्रत्येकी २०, भिरा, कोयना, खंद येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला.