शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताच्या वेळी कोणी उभं राहिलं नाही तरी चालतं, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा उठून उभं राहावं लागतं त्याचं काय ? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 09:52 IST

राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

ठळक मुद्देलोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत.राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे.

मुंबई - राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तोच धागा पकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून न्यायव्यवस्थेवर सडकून टीका केली आहे.  राष्ट्रगीत सुरू असताना कोणी उठून उभे राहिले नाही तरी चालेल, त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होत नाही, असेही न्यायसिंहासनाचे म्हणणे आहे. मग लोकांनी न्यायालयांना प्रश्न विचारला, ‘‘बरोबर आहे तुमचे. राष्ट्रगीताच्या वेळी कुणी उभे राहिले नाही तरी चालेल, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा मात्र तेथे हजर असलेल्या सगळयांनी उठून उभे राहायलाच हवे. नाही तर ‘माय लॉर्ड’ साहेबांचा अवमान होतो’’ त्याचे काय? असा सवाल अग्रलेखातून विचारला आहे. 

सध्या आमची न्यायालयेच सरकार चालवीत आहेत. लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत. फेरीवाल्यांचे काय करायचे, या प्रश्नापासून रस्ते व धरणांची दुरुस्ती, शाळाप्रवेश येथपर्यंत सरकारला आदेश द्यायचे, असेच सध्या न्यायालयांचे सुरू आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 

- राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे. राज्यकर्त्यांवरील लोकांच्या विश्वासाला तडे देण्याचे काम न्यायालयांनी करू नये. देशाच्या एका स्तंभावर दुसऱया स्तंभाचा असा हल्ला होणे कुणालाच परवडणारे नाही. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी आपले सावज टिपण्याचा प्रयत्न करीत असेल तर देशाला असलेला धोका वाढला आहे. सरकारलाही काही काम करू द्या. न्यायालयांनी न्याय द्यावा, राज्य करू नये, असे सांगणे हा न्यायदेवतेचा अवमान ठरत असेल तर माय लॉर्ड, आम्हाला माफ करा!

- सध्या आमची न्यायालयेच सरकार चालवीत आहेत. लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत. फेरीवाल्यांचे काय करायचे, या प्रश्नापासून रस्ते व धरणांची दुरुस्ती, शाळाप्रवेश येथपर्यंत सरकारला आदेश द्यायचे, असेच सध्या न्यायालयांचे सुरू आहे. राष्ट्रगीत सुरू असताना कोणी उठून उभे राहिले नाही तरी चालेल, त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होत नाही, असेही न्यायसिंहासनाचे म्हणणे आहे. मग लोकांनी न्यायालयांना प्रश्न विचारला, ‘‘बरोबर आहे तुमचे. राष्ट्रगीताच्या वेळी कुणी उभे राहिले नाही तरी चालेल, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा मात्र तेथे हजर असलेल्या सगळय़ांनी उठून उभे राहायलाच हवे. नाही तर ‘माय लॉर्ड’ साहेबांचा अवमान होतो’’ त्याचे काय? आता माय लॉर्ड साहेबांनी असा आदेश काढला आहे की, राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत. काय तर म्हणे, गुन्हेगारीमुक्त राजकारणासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला हे आदेश दिले आहेत. 

- आम्ही स्वतः न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. राजकारण गुन्हेगारीमुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक व्हायलाच हवे, पण मग ही साफसफाई फक्त राजकारणी अथवा नेत्यांच्याच बाबतीत का? दागी, कलंकित लोक सर्वच ठिकाणी आहेत. राष्ट्राचे जे चार स्तंभ वगैरे आपण म्हणतो, त्यातील एक प्रमुख स्तंभ न्यायालय आहे. हा स्तंभही भ्रष्टाचाराच्या वाळवीने कसा भुसभुशीत झाला आहे याचेही भान ठेवायला हवे, पण स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱयाचे पाहावे वाकून असे आता सगळय़ाच मान्यवरांच्या बाबतीत घडत आहे. एखाद्या गुन्हय़ात दोषी म्हणून सिद्ध झालेल्या नेत्यास निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी घालावी, अशी मागणी घेऊन एक भाजप नेते याचिका करतात व त्यावर सर्वोच्च न्यायालय फटकारे मारते. एखाद्या गुन्हेगारी खटल्यात तुरुंगवास भोगल्यानंतरही नेत्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा कायदा आज अस्तित्वात आहेच आणि लालू यादवांसह अनेकजण आज या कायद्यानुसार निवडणूक रिंगणाच्या बाहेर आहेत.

- अर्थात राजकीय विरोधकांची कायदेशीर नाकेबंदी करण्यासाठी सत्ताधारी मंडळी पक्षपाती धोरणे राबवीत असतात. पोलीस, आयकर विभाग, सीबीआय, ईडी अशा सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांचा पुरेपूर वापर याकामी केला जातो. आधीच्या सरकारने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निरपराध्यांना अडकवून सात-आठ वर्षे सडवले व आता त्यातले बरेच लोक निर्दोष सुटले. त्यातूनच न्यायालयेदेखील दबावाखाली येऊन निर्णय घेतात किंवा त्यांचे राजकीय लागेबांधे असतात असे आरोप होत असतात. 

- भ्रष्टाचाराचे आरोप न्याय यंत्रणेवरही झाले आहेत. न्यायालयांतील या बजबजपुरीवर आजीमाजी न्यायमूर्तींनीच अनेकदा कोरडे ओढले आहेत, पण भ्रष्टाचाराचा आरोप होऊनही न्यायमूर्ती त्यांच्या खुर्चीवर टिकून राहतात व त्यांना काढण्यासाठी तुमचा तो महाअभियोग की काय, तो चालवावा लागतो. असे किती महाअभियोग आतापर्यंत चालले? मुळात अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर लगेच राजकीय पदे स्वीकारून गाडीघोडय़ांची सोय लावून घेतात. कुणी राज्यसभेत येतो, कोणी राज्यपाल बनतो. हे सर्व थांबविणारा एखादा आदेश आमचे सर्वोच्च न्यायालय देणार आहे काय? राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे. राज्यकर्त्यांवरील लोकांच्या विश्वासाला तडे देण्याचे काम न्यायालयांनी करू नये. देशाच्या एका स्तंभावर दुस-या स्तंभाचा असा हल्ला होणे कुणालाच परवडणारे नाही. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी आपले सावज टिपण्याचा प्रयत्न करीत असेल तर देशाला असलेला धोका वाढला आहे. सरकारलाही काही काम करू द्या. न्यायालयांनी न्याय द्यावा, राज्य करू नये, असे सांगणे हा न्यायदेवतेचा अवमान ठरत असेल तर माय लॉर्ड, आम्हाला माफ करा!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना