शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गॅस संपल्यानं मृतदेह अर्धवटच जळाला; तब्बल ३ दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:29 IST

भाईंदरच्या स्मशान भूमीत गॅस संपल्याने मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याची घटना

ठळक मुद्देगेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी सदर पालिका स्मशानभुमीत गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना  गॅसच संपलाआतील यांत्रिक शेगडीत मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिलातीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्या नंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीतील गॅस संपल्या कारणाने अर्धवट जळालेल्या मृतदेहावर तब्बल तीन दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एरव्ही करदात्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेवर टीकेची झोड उठू लागली आहे. 

भाईंदर पश्चिमेस भोला नगर भागात महापालिकेची स्मशानभूमी आहे. पश्चिम भागातील ही एकमेव स्मशानभूमी असून येथे गॅस वरील शवदाहिनीत तसेच लाकडांच्या द्वारे अंत्यविधी केले जातात. पर्यावरणचा ऱ्हास व प्रदूषण टाळण्याचा समाजहिताचा विचार करणारे नागरिक आपल्या नातलगाचे अंत्यसंस्कार गॅस वरील शव दाहिनीत करण्यास प्राधान्य देतात. शिवाय अपघाती मृत्यू, बेवारस मृतदेहावर गॅस वरील शव दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना संसर्ग मुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी सुद्धा प्रामुख्याने गॅस दाहिनीत मोठ्या संख्येने करण्यात आले. त्यामुळे सदर गॅस वहिनीच्या देखभाल दुरुस्ती सह गॅस पुरवठ्या कडे महापालिका आणि नगरसेवक, पदाधिकारी यांनी वेळोवेळी लक्ष देणे, आढावा घेणे आवश्यक होते. 

परंतु गेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी सदर पालिका स्मशानभुमीत गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना  गॅसच संपला. त्यामुळे दहनविधी पूर्ण झाला नाही. आतील यांत्रिक शेगडीत मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिला. त्यापेक्षा आणखी संतापजनक बाब म्हणजे गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध तर केले गेले नाहीच पण गॅस उपलब्ध करून देण्यासाठी चक्क मंगळवार उजाडला. तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्या नंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले. तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता. 

ही अतिशय लाजिरवाणी पण संतापजनक अशी घटना आहे. पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांना स्वतःची दालने जनतेच्या पैशातून आलिशान करण्याचे, वाहन आदी भत्ते साठी कोटयावधी रुपये उधळण्याचे तेवढे कळते. जिवंत असताना पालिका आवश्यक सुखसुविधा देत नाही व सुखासुखी जगू देत नाही. आता मृत्यू नंतर सुद्धा विटंबना करत आहे.  हे नेहमीचे प्रकार घडत आहेत.- मिलन म्हात्रे, माजी नगरसेवक 

गॅस संपल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने लगेच कळवले पाहिजे होते. गॅस नव्हता तर लाकडांचा वापर करता आला असता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल - दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक