शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धक्कादायक! गॅस संपल्यानं मृतदेह अर्धवटच जळाला; तब्बल ३ दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:29 IST

भाईंदरच्या स्मशान भूमीत गॅस संपल्याने मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याची घटना

ठळक मुद्देगेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी सदर पालिका स्मशानभुमीत गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना  गॅसच संपलाआतील यांत्रिक शेगडीत मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिलातीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्या नंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीतील गॅस संपल्या कारणाने अर्धवट जळालेल्या मृतदेहावर तब्बल तीन दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एरव्ही करदात्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेवर टीकेची झोड उठू लागली आहे. 

भाईंदर पश्चिमेस भोला नगर भागात महापालिकेची स्मशानभूमी आहे. पश्चिम भागातील ही एकमेव स्मशानभूमी असून येथे गॅस वरील शवदाहिनीत तसेच लाकडांच्या द्वारे अंत्यविधी केले जातात. पर्यावरणचा ऱ्हास व प्रदूषण टाळण्याचा समाजहिताचा विचार करणारे नागरिक आपल्या नातलगाचे अंत्यसंस्कार गॅस वरील शव दाहिनीत करण्यास प्राधान्य देतात. शिवाय अपघाती मृत्यू, बेवारस मृतदेहावर गॅस वरील शव दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना संसर्ग मुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी सुद्धा प्रामुख्याने गॅस दाहिनीत मोठ्या संख्येने करण्यात आले. त्यामुळे सदर गॅस वहिनीच्या देखभाल दुरुस्ती सह गॅस पुरवठ्या कडे महापालिका आणि नगरसेवक, पदाधिकारी यांनी वेळोवेळी लक्ष देणे, आढावा घेणे आवश्यक होते. 

परंतु गेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी सदर पालिका स्मशानभुमीत गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना  गॅसच संपला. त्यामुळे दहनविधी पूर्ण झाला नाही. आतील यांत्रिक शेगडीत मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिला. त्यापेक्षा आणखी संतापजनक बाब म्हणजे गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध तर केले गेले नाहीच पण गॅस उपलब्ध करून देण्यासाठी चक्क मंगळवार उजाडला. तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्या नंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले. तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता. 

ही अतिशय लाजिरवाणी पण संतापजनक अशी घटना आहे. पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांना स्वतःची दालने जनतेच्या पैशातून आलिशान करण्याचे, वाहन आदी भत्ते साठी कोटयावधी रुपये उधळण्याचे तेवढे कळते. जिवंत असताना पालिका आवश्यक सुखसुविधा देत नाही व सुखासुखी जगू देत नाही. आता मृत्यू नंतर सुद्धा विटंबना करत आहे.  हे नेहमीचे प्रकार घडत आहेत.- मिलन म्हात्रे, माजी नगरसेवक 

गॅस संपल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने लगेच कळवले पाहिजे होते. गॅस नव्हता तर लाकडांचा वापर करता आला असता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल - दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक