शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आश्रमशाळा व्यवसाय प्रशिक्षणाला घरघर; समिती देणार अंतिम अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 02:04 IST

विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद, या योजनेला २०१३-१४ पासून केंद्राचा निधी मिळाला नसून राज्य योजनेतून याचा खर्च भागवला जात आहे.

सीमा महांगडेमुंबई : शासकीय आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे ही केंद्र सरकारकडून निधी प्राप्त न होणे, अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद न देणे अशा अनेक कारणांमुळे बंद करण्याचा विचार आदिवासी विकास विभागाकडून सुरू आहे. यासाठी विभागाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती आपला अहवाल ३ महिन्यांत सादर करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.

आदिवासी युवकांकरिता स्थानिक गरजांवर आधारित छाेटे प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे, अत्यंत गरजेची यंत्रे व अवजारे स्थानिकरीत्या दुरुस्त करून घेण्याच्या दृष्टीने कुशल कारागीर उपलब्ध करून देणे, हा या आश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या राज्यात १५ बेसिक पोस्ट आश्रमशाळांतील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांत ११४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. 

मात्र या योजनेला २०१३-१४ पासून केंद्राचा निधी मिळाला नसून राज्य योजनेतून याचा खर्च भागवला जात आहे. योजना सुरू झाल्यापासून प्रशिक्षण अभ्यासक्रमाचेही अद्ययावतीकरण झाले नसल्याने विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यातील काही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित केंद्रांविषयी काय निर्णय घ्यावा? तेथील अभ्यासक्रमाचे मूल्यांकन करून सुधारित अभ्यासक्रम राबविता येईल का? केंद्र बंद करायचे झाल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे व कुठे करता येईल याचा अभ्यास करून समिती अहवाल सादर करेल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची भीतीया योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन तसेच प्रशिक्षणानंतर ३ महिने शहरी भागातील कार्यशाळेत प्रात्यक्षिकांची संधी, आवश्यक कच्चे साहित्य व अनुषंगिक अवजारे पुरविण्यात येतात. त्यामुळे ही योजना बंद केल्यास आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची मते तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना