शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

आपल्याकडील खात्याबाबत आपले व्हिजन काय आहे?

By admin | Updated: December 20, 2014 02:08 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्ते, उड्डाण पूल उभे करायचे आहेत. त्याचवेळी लोकांवर टोलचा भार पडू नये याकरिता कोणता

प्रश्न- आपल्याकडील खात्याबाबत आपले व्हिजन काय आहे?शिंदे- राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्ते, उड्डाण पूल उभे करायचे आहेत. त्याचवेळी लोकांवर टोलचा भार पडू नये याकरिता कोणता वेगळा पर्याय स्वीकारता येईल याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. महामंडळाकडील प्रलंबित प्रकल्पांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण करायचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जुने प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा लागेल. याचबरोबर रस्ते, उड्डाण पूल यावरील प्रवास सुरक्षित व अपघाताशिवाय होण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रश्न- वरळी-हाजीअली सी लिंकच्या उभारणीबाबत भूमिका काय?शिंदे- वरळी-हाजीअली सी लिंक उभारणीचा पाठपुरावा करणार आहे. सी लिंकचा पुढचा टप्पा उभा राहिला पाहिजे हे आपले मत आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोस्टल रोडबाबत आग्रही आहेत. मुंबई महापालिकेने कोस्टल रोड बांधण्याची तयारी दाखवली आहे. शासनाने त्या प्रकल्पाला सहकार्य केले पाहिजे. ही कामे लवकरात लवकर सुरू केली जातील.प्रश्न- टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा या सरकारने केली आहे. ती कशी अमलात आणणार?शिंदे- टोलचा भार कसा कमी करता येईल याकरिता जोशी समितीची स्थापना केलेली आहे. थेट टोल रद्द केला तर मोठ्या प्रमाणावर कोर्टकज्जे होतील आणि सरकारला मोठ्या रकमेची भरपाई टोल कंपन्यांना द्यावी लागेल. त्यामुळे टोलचे दर कमी करणे, जेथे प्रकल्पाची किंमत वसूल झाली आहे अशा ठिकाणी सुरू असलेली वसुली थांबवणे असे उपाय करून लोकांना दिलासा द्यावा लागेल.प्रश्न- रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्यावर कसे नियंत्रण मिळवणार?शिंदे- वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाहनांची संख्या वाढण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रस्ते सुस्थितीत असले तर अपघात टाळता येतात. रस्ते हा राज्याच्या विकासातील प्रमुख भाग आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याकरिता चांगले रस्ते हवेत. याचबरोबर सुरक्षित वाहतुकीकरिता सिग्नल, रस्ते दुभाजक, साईनबोर्ड अशा सोयीसुविधा हव्यात.प्रश्न- राज्य रस्ते विकास महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे हे खरे आहे का? महामंडळाला सावरण्याकरिता कोणते उपाय योजणार ?शिंदे- महामंडळ आर्थिक संकटात आहे हे खरे आहे. राज्य सरकारकडून महामंडळाला ३५०० कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. अनेक प्रकल्पांकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक उपक्रम ही खाती एकाच मंत्र्याकडे असायची. कालांतराने मागील सरकारमध्ये ही खाती वेगवेगळी करून देण्यात आली. काँग्रेसकडील एमएमआरडीएचे महत्त्व वाढवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडील राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हेतूत: दुर्लक्ष केले गेले. परिस्थिती बिकट असली तरी लोकांना सेवा पुरवताना त्यांच्यावर बोजा टाकायचा नाही ही तारेवरील कसरत करण्याचा निर्धार केला आहे.