शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याकडील खात्याबाबत आपले व्हिजन काय आहे?

By admin | Updated: December 20, 2014 02:08 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्ते, उड्डाण पूल उभे करायचे आहेत. त्याचवेळी लोकांवर टोलचा भार पडू नये याकरिता कोणता

प्रश्न- आपल्याकडील खात्याबाबत आपले व्हिजन काय आहे?शिंदे- राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्ते, उड्डाण पूल उभे करायचे आहेत. त्याचवेळी लोकांवर टोलचा भार पडू नये याकरिता कोणता वेगळा पर्याय स्वीकारता येईल याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. महामंडळाकडील प्रलंबित प्रकल्पांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण करायचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जुने प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा लागेल. याचबरोबर रस्ते, उड्डाण पूल यावरील प्रवास सुरक्षित व अपघाताशिवाय होण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रश्न- वरळी-हाजीअली सी लिंकच्या उभारणीबाबत भूमिका काय?शिंदे- वरळी-हाजीअली सी लिंक उभारणीचा पाठपुरावा करणार आहे. सी लिंकचा पुढचा टप्पा उभा राहिला पाहिजे हे आपले मत आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोस्टल रोडबाबत आग्रही आहेत. मुंबई महापालिकेने कोस्टल रोड बांधण्याची तयारी दाखवली आहे. शासनाने त्या प्रकल्पाला सहकार्य केले पाहिजे. ही कामे लवकरात लवकर सुरू केली जातील.प्रश्न- टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा या सरकारने केली आहे. ती कशी अमलात आणणार?शिंदे- टोलचा भार कसा कमी करता येईल याकरिता जोशी समितीची स्थापना केलेली आहे. थेट टोल रद्द केला तर मोठ्या प्रमाणावर कोर्टकज्जे होतील आणि सरकारला मोठ्या रकमेची भरपाई टोल कंपन्यांना द्यावी लागेल. त्यामुळे टोलचे दर कमी करणे, जेथे प्रकल्पाची किंमत वसूल झाली आहे अशा ठिकाणी सुरू असलेली वसुली थांबवणे असे उपाय करून लोकांना दिलासा द्यावा लागेल.प्रश्न- रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्यावर कसे नियंत्रण मिळवणार?शिंदे- वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाहनांची संख्या वाढण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रस्ते सुस्थितीत असले तर अपघात टाळता येतात. रस्ते हा राज्याच्या विकासातील प्रमुख भाग आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याकरिता चांगले रस्ते हवेत. याचबरोबर सुरक्षित वाहतुकीकरिता सिग्नल, रस्ते दुभाजक, साईनबोर्ड अशा सोयीसुविधा हव्यात.प्रश्न- राज्य रस्ते विकास महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे हे खरे आहे का? महामंडळाला सावरण्याकरिता कोणते उपाय योजणार ?शिंदे- महामंडळ आर्थिक संकटात आहे हे खरे आहे. राज्य सरकारकडून महामंडळाला ३५०० कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. अनेक प्रकल्पांकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक उपक्रम ही खाती एकाच मंत्र्याकडे असायची. कालांतराने मागील सरकारमध्ये ही खाती वेगवेगळी करून देण्यात आली. काँग्रेसकडील एमएमआरडीएचे महत्त्व वाढवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडील राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हेतूत: दुर्लक्ष केले गेले. परिस्थिती बिकट असली तरी लोकांना सेवा पुरवताना त्यांच्यावर बोजा टाकायचा नाही ही तारेवरील कसरत करण्याचा निर्धार केला आहे.