शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपुरती हेल्मेटसक्ती काय कामाची?

By admin | Updated: July 22, 2016 02:31 IST

हेल्मेटसक्ती लागू व्हावी, यासाठी नो हेल्मेट नो फ्युएल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली

ठाणे/डोंबिवली : हेल्मेटसक्ती लागू व्हावी, यासाठी नो हेल्मेट नो फ्युएल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आणि त्याबद्दल सोशल मीडियासह कॉलेज कट्ट्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. हेल्मेटसक्ती व्हायला हवी, यावर तरुणाईचे एकमत असले तरी पेट्रोल भरण्यापुरत्या सक्तीवर त्यांनी टीका केली आहे. पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट घातले आणि नंतर काढले तर, मुळात सक्ती कशासाठी, हे पटले पाहिजे. दंडाची रक्कमही ज्यांना किरकोळ वाटते, त्यांचा बंदोबस्त कसा करणार. कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी काही काळाने थंडावते तसेच याचेही होईल, असे अनेक धोके दाखवून देताना अंमलबजावणीची यंत्रणाच तोकडी असल्यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. हेल्मेट नसले तर वाहतूक पोलीस दंड करतात. पण, म्हणून एकदा दंड भरलेला नंतर कायम हेल्मेट वापरतोच, असे नाही. या कारवाईकडे अनेक बाइकस्वार गांभीर्याने पाहत नाहीत. सध्या १०० रुपये दंड आकारला जातो, पण त्या १०० रुपयांचे अनेकांना विशेषत: कॉलेज तरुणांना फार काही वाटत नाही. त्यामुळे हेल्मेट घातले नाही, तर पेट्रोल मिळणार नाही, ही घोषणा योग्य आहे. यात शिक्षाही होईल आणि दंडाच्या स्वरूपात बसणारा फटकाही नसेल. - अभिजित बारसे, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांची घोषणा अयोग्य आहे. केवळ पेट्रोल मिळावे म्हणून हेल्मेट वापरा, ही संकल्पनाच पटत नाही. एखादा जर पेट्रोलपंपाच्या शेजारी राहत असेल तर पेट्रोल मिळणार नाही म्हणून त्याने दोन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरायचे का? दोन-तीन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरावे का? जिथे खूप अपघात होतात, वाहन जलदगतीने चालवले जाते, अशा रस्त्यांवर हेल्मेट वापरले पाहिजे. परंतु, जवळच्या अंतरासाठी प्रत्येक वेळी हेल्मेट वापरणे गरजेचे नाही. - प्रसाद दलाल, बीई, दत्ता मेघे महाविद्यालय>विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा चांगली आहे. त्यातून अपघातांना आळा बसेल. त्यातील जीव वाचू शकेल. परंतु, प्रत्येक जण हा नियम किती पाळेल, याबाबत शंका आहे. आपल्याकडे एखादा निर्णय घेतला किंवा कायदा केला, तर त्याचे फार काळ पालन केले जात नाही. त्यामुळे ‘नो हेल्मेट नो फ्युएल’ ही घोषणा वाहनचालक किती गांभीर्याने घेतील, याबाबत शंकाच आहे. - अश्विनी सावंत, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आजकालची वाहतूक पाहता आपण जरी सुरक्षितपणे वाहन चालवले तरी आपल्या आजूबाजूचा वाहनचालक हा सुरक्षितपणे वाहन चालवेल, याबाबत विश्वास उरलेला नाही. हेल्मेट केवळ स्वत:च्या नव्हे, तर दुसऱ्याच्या सुरक्षिततेसाठी घातलेच पाहिजे, यात शंकाच नाही. लोकांना साधेपणाने सांगून पटत नाही. त्यामुळे या घोषणेत हे केले नाही तर ते मिळणार नाही, हा जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. निदान पेट्रोलसाठी का होईना, हा नियम पाळला जाईल. या निर्णयामुळे पेट्रोलही मिळेल आणि सुरक्षिततेचा हेतूदेखील साध्य होईल. - सानिका कट्टी, एमए इन संस्कृत, मुंबई विद्यापीठ