शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पेट्रोलपुरती हेल्मेटसक्ती काय कामाची?

By admin | Updated: July 22, 2016 02:31 IST

हेल्मेटसक्ती लागू व्हावी, यासाठी नो हेल्मेट नो फ्युएल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली

ठाणे/डोंबिवली : हेल्मेटसक्ती लागू व्हावी, यासाठी नो हेल्मेट नो फ्युएल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आणि त्याबद्दल सोशल मीडियासह कॉलेज कट्ट्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. हेल्मेटसक्ती व्हायला हवी, यावर तरुणाईचे एकमत असले तरी पेट्रोल भरण्यापुरत्या सक्तीवर त्यांनी टीका केली आहे. पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट घातले आणि नंतर काढले तर, मुळात सक्ती कशासाठी, हे पटले पाहिजे. दंडाची रक्कमही ज्यांना किरकोळ वाटते, त्यांचा बंदोबस्त कसा करणार. कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी काही काळाने थंडावते तसेच याचेही होईल, असे अनेक धोके दाखवून देताना अंमलबजावणीची यंत्रणाच तोकडी असल्यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. हेल्मेट नसले तर वाहतूक पोलीस दंड करतात. पण, म्हणून एकदा दंड भरलेला नंतर कायम हेल्मेट वापरतोच, असे नाही. या कारवाईकडे अनेक बाइकस्वार गांभीर्याने पाहत नाहीत. सध्या १०० रुपये दंड आकारला जातो, पण त्या १०० रुपयांचे अनेकांना विशेषत: कॉलेज तरुणांना फार काही वाटत नाही. त्यामुळे हेल्मेट घातले नाही, तर पेट्रोल मिळणार नाही, ही घोषणा योग्य आहे. यात शिक्षाही होईल आणि दंडाच्या स्वरूपात बसणारा फटकाही नसेल. - अभिजित बारसे, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांची घोषणा अयोग्य आहे. केवळ पेट्रोल मिळावे म्हणून हेल्मेट वापरा, ही संकल्पनाच पटत नाही. एखादा जर पेट्रोलपंपाच्या शेजारी राहत असेल तर पेट्रोल मिळणार नाही म्हणून त्याने दोन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरायचे का? दोन-तीन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट वापरावे का? जिथे खूप अपघात होतात, वाहन जलदगतीने चालवले जाते, अशा रस्त्यांवर हेल्मेट वापरले पाहिजे. परंतु, जवळच्या अंतरासाठी प्रत्येक वेळी हेल्मेट वापरणे गरजेचे नाही. - प्रसाद दलाल, बीई, दत्ता मेघे महाविद्यालय>विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा चांगली आहे. त्यातून अपघातांना आळा बसेल. त्यातील जीव वाचू शकेल. परंतु, प्रत्येक जण हा नियम किती पाळेल, याबाबत शंका आहे. आपल्याकडे एखादा निर्णय घेतला किंवा कायदा केला, तर त्याचे फार काळ पालन केले जात नाही. त्यामुळे ‘नो हेल्मेट नो फ्युएल’ ही घोषणा वाहनचालक किती गांभीर्याने घेतील, याबाबत शंकाच आहे. - अश्विनी सावंत, एसवायबीए, जोशी-बेडेकर महाविद्यालय>परिवहनमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आजकालची वाहतूक पाहता आपण जरी सुरक्षितपणे वाहन चालवले तरी आपल्या आजूबाजूचा वाहनचालक हा सुरक्षितपणे वाहन चालवेल, याबाबत विश्वास उरलेला नाही. हेल्मेट केवळ स्वत:च्या नव्हे, तर दुसऱ्याच्या सुरक्षिततेसाठी घातलेच पाहिजे, यात शंकाच नाही. लोकांना साधेपणाने सांगून पटत नाही. त्यामुळे या घोषणेत हे केले नाही तर ते मिळणार नाही, हा जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. निदान पेट्रोलसाठी का होईना, हा नियम पाळला जाईल. या निर्णयामुळे पेट्रोलही मिळेल आणि सुरक्षिततेचा हेतूदेखील साध्य होईल. - सानिका कट्टी, एमए इन संस्कृत, मुंबई विद्यापीठ