शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Devendra Fadnavis: बाळासाहेबांना काय उत्तर द्याल? देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:18 IST

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढला. तत्पूर्वी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्धवजी, तुमचे सरकार तुम्हाला लखलाभ असो. पण, एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागेल. मुंबईच्या चिंधड्या, चिंधड्या करवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केले, या त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्याल? आम्ही तर सांगू की, बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. पण, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढला. तत्पूर्वी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांच्यासह खासदार, आमदार, उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, उद्धवजी, तुमचे आमचे जमत नसेल सोडून द्या. पण, मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवले, हा देशद्रोह्याच्या विरोधातील संघर्ष आहे. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष करू. अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेता तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का? कोणता संदेश तुम्हाला द्यायचा आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, खोलात जाऊनच या रेकॉर्डिंगप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. म्हणूनच सीबीआय चौकशी करा, अशी मागणी आहे.

आधी सभा, मग मोर्चाआझाद मैदान येथील सभेनंतर भाजपचा मोर्चा मेट्रो सिनेमामार्गे विधानभवनाच्या दिशेने निघाला. मात्र, पोलिसांनी त्याला परवानगी नाकारत मेट्रो सिनेमाजवळ फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना ताब्यात घेत यलो गेट पोलीस ठाण्यात नेले. काहीवेळाने सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे