शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

तिथे महिलांना काय किंमत मिळणार?

By admin | Updated: January 21, 2017 01:25 IST

महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.

सोमेश्वरनगर : महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. त्यामुळे जिथे ग्रामीण भागातील माणसालाच किंमत नाही तिथे महिलांना काय मिळणार आहे? असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि मराठी विभाग आयोजित लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललिता गादगे होत्या. चर्चासत्राचे उद्घाटन ग्रामीण लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. श्रीपती रायमाने, डॉ. जया कदम, प्रा. प्रवीण ताटे देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या ग्रंथाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशातील साहित्यिकांनी उपस्थिती दाखविली होती. प्रा. प्रवीण ताटे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राणी शेंडकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)>..कमी तरतुदीडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सध्याच्या काळात शेतीपेक्षा इतर उद्योगांना महत्त्व वाढत आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या बजेटमध्येदेखील शेती उद्योगासाठी फारच कमी प्रमाणात तरतुदी केल्या जातात ही चिंतेची बाब आहे, असे सांगून इतिहासामध्ये काही मतभेद असतात म्हणून पुढच्या पिढीने मतभेद ठेवून जगायचं का? उपेक्षा ही गोष्ट व्यापक सामाजिक पटावर समजून घेण्याची बाब आहे. डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. ललिता गादगे, डॉ. जया कदम यांनी मनोगते व्यक्त केली.