शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

तिथे महिलांना काय किंमत मिळणार?

By admin | Updated: January 21, 2017 01:25 IST

महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.

सोमेश्वरनगर : महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. त्यामुळे जिथे ग्रामीण भागातील माणसालाच किंमत नाही तिथे महिलांना काय मिळणार आहे? असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि मराठी विभाग आयोजित लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललिता गादगे होत्या. चर्चासत्राचे उद्घाटन ग्रामीण लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. श्रीपती रायमाने, डॉ. जया कदम, प्रा. प्रवीण ताटे देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या ग्रंथाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशातील साहित्यिकांनी उपस्थिती दाखविली होती. प्रा. प्रवीण ताटे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राणी शेंडकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)>..कमी तरतुदीडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सध्याच्या काळात शेतीपेक्षा इतर उद्योगांना महत्त्व वाढत आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या बजेटमध्येदेखील शेती उद्योगासाठी फारच कमी प्रमाणात तरतुदी केल्या जातात ही चिंतेची बाब आहे, असे सांगून इतिहासामध्ये काही मतभेद असतात म्हणून पुढच्या पिढीने मतभेद ठेवून जगायचं का? उपेक्षा ही गोष्ट व्यापक सामाजिक पटावर समजून घेण्याची बाब आहे. डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. ललिता गादगे, डॉ. जया कदम यांनी मनोगते व्यक्त केली.