शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

By प्रविण मरगळे | Updated: September 6, 2023 12:41 IST

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली.

मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालना येथे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. अंबड तालुकयातील अंतरवाली सराटी या लहानशा गावात मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यावर लाठी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक मराठा बांधव जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले. त्यानंतर सर्व महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी सरकारवर प्रहार केले. मराठा आंदोलनाची धग राज्यभर पसरली. विरोधकांनी गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. या घटनेबाबत नुसतेच सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली पण त्याचसोबत गोवारी प्रकरणाची आठवण करून देत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली. गोवारी समाजानं आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात ११४ जणांचा मृत्यू झाला होता. १९८५ साली निघालेल्या एका जीआरमुळे गोवारी समाजाचं अस्तित्व धोक्यात आले होते. आदिवासी समाजातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी गोवारी समाज लढत होता. हिवाळी अधिवेशनाचा तो काळ, नागपूरमध्ये विविध समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चे, आंदोलन करत असतो. १९९४ साली असेच घडले. २३ नोव्हेंबरचा तो दिवस, गोवारी समाजातील हजारो बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले.

नागपूरच्या मोरिस कॉलेज टी पाँईटला गोवारी बांधव जमा झाले. आदिवासींच्या सवलतीपासून आम्हाला वंचित ठेऊ नका अशी या समाजाची मागणी होती. टी पाँईटपासून येणाऱ्या लहान रस्त्यावरून हा मोर्चा विधानसभेच्या दिशेने जात होता. परंतु तिथेच अडवण्यात आला. गोवारी समाजातील बांधव २-३ दिवसांच्या शिदोरी घेऊन आंदोलनात कुटुंबासह सहभागी झाले होते. या मोर्चात अत्यंत गरीब लोकं होती. आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्या अशी मागणी मोर्चेकरांनी सरकारकडे केली होती. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शांतपणे निघालेल्या या मोर्चाला तेव्हाच्या सरकारमधील कुणीही सामोरे गेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवली. नागपूरच्या विधानभवनापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या या मोर्चाची दखल जर मुख्यमंत्री पवार आणि त्यांच्या सरकारने घेतली असती तर कदाचित ही भयंकर दुर्घटना झाली नसती.

सरकारकडून गोवारी समाजाच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमध्ये असंतोष पसरला, त्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर गेली. हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर होते. अशा परिस्थितीत तिथे गोंधळ माजला. आंदोलक सैरावैरा पळू लागले त्या चेंगराचेंगरी ११४ गोवारी शहीद झाले. मृतांमध्ये ७१ महिला, १७ पुरुष आणि २३ लहाना मुलांचा समावेश होता. सुरुवातीला या घटनेत ५-६ दण दगावले असतील असा अंदाज वर्तवण्यात आला. परंतु त्यानंतर रात्री उशीरा जेव्हा मृतांचा आकडा समोर आला तेव्हा राज्यात हाहाकार माजला. ५०० हून अधिक मोर्चेकरी जखमी झाले होते. परंतु या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दाणी आयोगाने पोलिसांवर ठपका ठेवला नाही. याआधी अशी घटना राज्यात कधीही घडली नव्हती. आजही गोवारी समाजाच्या या आंदोलनातील दुर्घटनेतमुळे अनेकांचे डोळे पाणावतात. नागपूरमध्ये आज टी पाँईटला आजही गोवारी शहीद स्मारकाजवळ अभिवादनासाठी दरवर्षी लोकं जमतात. 

जालनातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश कुणी दिले असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या कारकिर्दीत झालेल्या घटनांची आठवण करू दिली. २८ वर्षांनी पुन्हा गोवारी आंदोलनावरून राजकीय नेते एकमेकांना भिडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर आरोप करताना म्हटलं की, लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून दिले जात नाहीत. हे अधिकार एसपी आणि डिवायएसपी यांना असतात. परंतु ज्यावेळी निष्पाप गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा तसा आदेश कुणी दिला होता. तो मंत्रालयातून आला होता का असा सवाल करत शरद पवारांना टार्गेट केले. तर शरद पवारांनीही फडणवीसांना उत्तर देत गोवारीची घटना २८ वर्षापूर्वी घडली आहे. त्यावेळी लाठीचार्ज झाला नव्हता तर चेंगराचेंगरीत माणसं मृत्यूमुखी पडली होती. इतकेच नाही तर या घटनेनंतर संबंधित खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता असं प्रत्युत्तर पवारांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण