शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

By admin | Updated: June 7, 2017 08:02 IST

तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मुख्यमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, यापुढे फक्त शेतकरी नेत्यांशीच चर्चा करू. पण हे शेतकरी नेते कोण? तुम्ही सदाभाऊ व जयाजी सूर्यवंशीशी बोललात. शेतकऱ्यांनी त्यांना मानलेच नाही. आमची एक उपसूचना यावर आहे. वाटल्यास हरकतीचा मुद्दा समजावा. शेतकरी नेत्यांशी फक्त सरकारातील खऱ्या शेतकऱ्यांनीच बोलावे! तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 
 
राजू शेट्टी यांनी असे ठणकावले आहे की, सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चात्ताप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच सरकारमधून बाहेर पडू असेही त्यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या संपास आणि ‘महाराष्ट्र बंद’ला प्रचंड यश मिळाले आहे. त्यानंतर राजकीय जोडे बाजूला काढून शेतकरी संघटनांचे अनेक जुनेजाणते पुढारी एकत्र आले आहेत. ‘फोडा, झोडा’ नीतीचा प्रयोग करूनही तो यशस्वी झाला नाही. नेत्यांत मतभेद असले तरी शेतकरी एकवटला व सरकारला घाम फोडला हे महत्त्वाचे. आता पुढे काय? हाच प्रश्न असला तरी एकत्र आलेल्या शेतकरी नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाऱ्यांप्रमाणे वागू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 
 
लढणा-यांना गळास लावायचे व त्या स्फोटक बॉम्बची वात काढून घ्यायची आणि बॉम्बचा रबरी चेंडू बनवायचा हे प्रकार काँग्रेसने याआधी केले व महाराष्ट्रातील फडणवीस सरकार याबाबत काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत आहे. इतर बाबतीत भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसशी तीव्र म्हणजे टोकाचे मतभेद आहेत. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे त्यांनी मनावर घेतलेच आहे, पण काँग्रेसची काही ध्येयधोरणे मात्र त्यांनी पवित्र करून नव्हे तर जशीच्या तशी स्वीकारली आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
चळवळे व आंदोलक लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे फुसके आपटी बार करायचे. रामदास आठवले वगैरेंची फुसकुली काँग्रेसने केली तशी फडणवीस यांनी सदाभाऊंची केली. जादूगार कबुतराची कोंबडी करतो किंवा सशाचे मांजर करतो हे माहीत होते, पण फडणवीस यांनी विंचवाचे साफ झुरळ करून टाकले. हा जादुई प्रयोग शरद पवारांनाही जमला नसता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर उपरोधक टीका केली आहे.
 
‘एखाद्याने इतकेही स्वतःला बदलू नये की, त्याचा सदाभाऊ होईल’ असे टवाळकीने का म्हटले जात आहे याचा विचार सत्तेच्या कच्छपि लागलेल्या चळवळ्यांना आता करावाच लागेल. महादेव जानकरांची सध्याची राजकीय अवस्था काय आहे हे ते स्वतःदेखील सांगू शकणार नाहीत. लढणाऱ्यांना नपुंसक बनवून किंवा त्यांच्या चळवळीची नसबंदी करून राज्यकर्ते नेहमीच शांतता विकत घेत असतात, पण नेते गळास लागले तरी जनतेच्या मनातील संताप लाव्हा बनून उफाळून येतच असतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत तेच घडले आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांचे नेतृत्व संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याची चाल सरकारने खेळली. ती एका रात्रीपुरती यशस्वी झाली, पण राजकारणातील कारस्थाने सदान्कदा यशस्वी होत नाहीत. काही गोष्टी राज्यकर्त्यांनी गांभीर्याने करावयाच्या असतात. पंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतच्या निवडणुका जिंकणे सोपे आहे. सत्ता व पैसा हाती असला तर चंद्रावरही निवडणुका जिंकता येतील. याचा अर्थ लोक तुमचे गुलाम आहेत असे गृहीत धरता येत नाही. राजकारणात सदाभाऊंची पैदास करण्यापेक्षा जनतेच्या लढ्याची भावना समजून घ्या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
 
दुसरे महत्त्वाचे असे की, ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ या ऐतिहासिक सत्याची चाड महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ठेवायला हवी. रस्त्यावर उतरलेला आंदोलक शेतकरी नव्हता असा शोध लावून या मंडळींनी काय साध्य केले? जीन्स पॅण्टीत शेतकरी कधीपासून वावरू लागला? असा प्रश्न करून त्यांनी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची विटंबनाच केली. सुटाबुटातले लोक शेतकऱ्यांना सल्ले देऊ शकतात. ‘‘कर्जमाफी करणार नाही’’ असे सांगणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य या काय नऊवारी साडी व नाकात नथ घालून स्टेट बँकेच्या खुर्चीवर बसल्या आहेत काय? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मोबाईलचे बिल भरायला पैसे आहेत, पण विजेचे बिल भरायला शेतकरी टाळाटाळ करतो अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना असेही विचारता येईल की, ‘‘बाबांनो, निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता खेचण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करता ना, मग कर्जमुक्तीसाठी का रडता?’’ शेतकरी रस्त्यावर उतरला म्हणून त्याच्याशी सूडाने वागाल तर याद राखा! असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.