शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

By admin | Updated: June 7, 2017 08:02 IST

तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मुख्यमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, यापुढे फक्त शेतकरी नेत्यांशीच चर्चा करू. पण हे शेतकरी नेते कोण? तुम्ही सदाभाऊ व जयाजी सूर्यवंशीशी बोललात. शेतकऱ्यांनी त्यांना मानलेच नाही. आमची एक उपसूचना यावर आहे. वाटल्यास हरकतीचा मुद्दा समजावा. शेतकरी नेत्यांशी फक्त सरकारातील खऱ्या शेतकऱ्यांनीच बोलावे! तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 
 
राजू शेट्टी यांनी असे ठणकावले आहे की, सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चात्ताप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच सरकारमधून बाहेर पडू असेही त्यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या संपास आणि ‘महाराष्ट्र बंद’ला प्रचंड यश मिळाले आहे. त्यानंतर राजकीय जोडे बाजूला काढून शेतकरी संघटनांचे अनेक जुनेजाणते पुढारी एकत्र आले आहेत. ‘फोडा, झोडा’ नीतीचा प्रयोग करूनही तो यशस्वी झाला नाही. नेत्यांत मतभेद असले तरी शेतकरी एकवटला व सरकारला घाम फोडला हे महत्त्वाचे. आता पुढे काय? हाच प्रश्न असला तरी एकत्र आलेल्या शेतकरी नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाऱ्यांप्रमाणे वागू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 
 
लढणा-यांना गळास लावायचे व त्या स्फोटक बॉम्बची वात काढून घ्यायची आणि बॉम्बचा रबरी चेंडू बनवायचा हे प्रकार काँग्रेसने याआधी केले व महाराष्ट्रातील फडणवीस सरकार याबाबत काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत आहे. इतर बाबतीत भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसशी तीव्र म्हणजे टोकाचे मतभेद आहेत. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे त्यांनी मनावर घेतलेच आहे, पण काँग्रेसची काही ध्येयधोरणे मात्र त्यांनी पवित्र करून नव्हे तर जशीच्या तशी स्वीकारली आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
चळवळे व आंदोलक लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे फुसके आपटी बार करायचे. रामदास आठवले वगैरेंची फुसकुली काँग्रेसने केली तशी फडणवीस यांनी सदाभाऊंची केली. जादूगार कबुतराची कोंबडी करतो किंवा सशाचे मांजर करतो हे माहीत होते, पण फडणवीस यांनी विंचवाचे साफ झुरळ करून टाकले. हा जादुई प्रयोग शरद पवारांनाही जमला नसता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर उपरोधक टीका केली आहे.
 
‘एखाद्याने इतकेही स्वतःला बदलू नये की, त्याचा सदाभाऊ होईल’ असे टवाळकीने का म्हटले जात आहे याचा विचार सत्तेच्या कच्छपि लागलेल्या चळवळ्यांना आता करावाच लागेल. महादेव जानकरांची सध्याची राजकीय अवस्था काय आहे हे ते स्वतःदेखील सांगू शकणार नाहीत. लढणाऱ्यांना नपुंसक बनवून किंवा त्यांच्या चळवळीची नसबंदी करून राज्यकर्ते नेहमीच शांतता विकत घेत असतात, पण नेते गळास लागले तरी जनतेच्या मनातील संताप लाव्हा बनून उफाळून येतच असतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत तेच घडले आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांचे नेतृत्व संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याची चाल सरकारने खेळली. ती एका रात्रीपुरती यशस्वी झाली, पण राजकारणातील कारस्थाने सदान्कदा यशस्वी होत नाहीत. काही गोष्टी राज्यकर्त्यांनी गांभीर्याने करावयाच्या असतात. पंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतच्या निवडणुका जिंकणे सोपे आहे. सत्ता व पैसा हाती असला तर चंद्रावरही निवडणुका जिंकता येतील. याचा अर्थ लोक तुमचे गुलाम आहेत असे गृहीत धरता येत नाही. राजकारणात सदाभाऊंची पैदास करण्यापेक्षा जनतेच्या लढ्याची भावना समजून घ्या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
 
दुसरे महत्त्वाचे असे की, ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ या ऐतिहासिक सत्याची चाड महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ठेवायला हवी. रस्त्यावर उतरलेला आंदोलक शेतकरी नव्हता असा शोध लावून या मंडळींनी काय साध्य केले? जीन्स पॅण्टीत शेतकरी कधीपासून वावरू लागला? असा प्रश्न करून त्यांनी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची विटंबनाच केली. सुटाबुटातले लोक शेतकऱ्यांना सल्ले देऊ शकतात. ‘‘कर्जमाफी करणार नाही’’ असे सांगणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य या काय नऊवारी साडी व नाकात नथ घालून स्टेट बँकेच्या खुर्चीवर बसल्या आहेत काय? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मोबाईलचे बिल भरायला पैसे आहेत, पण विजेचे बिल भरायला शेतकरी टाळाटाळ करतो अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना असेही विचारता येईल की, ‘‘बाबांनो, निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता खेचण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करता ना, मग कर्जमुक्तीसाठी का रडता?’’ शेतकरी रस्त्यावर उतरला म्हणून त्याच्याशी सूडाने वागाल तर याद राखा! असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.