शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

बँक संपाचे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 13:28 IST

असोसिएट बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण तसेच बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांना विरोध करण्यासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी शुक्रवारी एका दिवसाच्या संपावर आहेत.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ - असोसिएट बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण तसेच बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांना विरोध करण्यासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी शुक्रवारी एका दिवसाच्या संपावर असून देशातील बँकिंग सेवा विस्कळीत झाली आहे. 
युनायटेड फोरम ऑफ बँकस् युनियन (यूएफबीयू) या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप होत असून या संघटनेत देशभरातील ९ बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटना सहभागी झाले आहेत. या संघटनांचे ८ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी सदस्य आहेत. या संपामुळे बँकांच्या चेक क्लीअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. 
 
 
दरम्यान बँकाचा हा देशव्यापी संप नेमका आहे कशासाठी? हे जाणून घेऊया...
-  सामान्य ठेवीदारांकडून ४ टक्के एवढ्या अत्यल्प बचत व्याजदराने ठेवी घेऊन त्याचा वापर बढ्या उद्योगसमुहांना कमी व्याजदराने कोट्यावधींची कर्जे देण्यासाठी होतो़
- या उद्योग समुहांची कर्जे नियोजित पध्दतीने थकीत होतात़ त्या कर्जाचे वारंवार पुनर्गठन करून वसुली पुढे ढकलली जाते़
- कालांतराने अशी कर्जे एकतर माफ केली जातात अथवा भरमसाठ सुट देऊन बंद केली जातात़ अथवा ही थकीत कर्जे अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांना नगण्य किंमतीला विकली जातात
- थकीत कर्जासाठी कराव्या लागणा-या तरतूदीमुळे बँका तोट्यात, परिणामी त्यांच्या भांडवलावर ताण, बँकांच्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारतर्फे भांडवल पुरवण्यात येणार, बॅकांच्या भांडवलाची गरज एकूण १४०००० कोटी आहे़
- बॅकांना भांडवल देण्यासाठी केंद्रीत अर्थसंकल्पात तरतूद केली जाते़ म्हणजे सामान्य नागरिकांकडून कर रूपाने पैसे गोळा करून ही तरतूद पूर्ण केली जाते़
थोडक्यात सामान्य बचतदाराचे पैसे उद्योग घराण्यांना कर्जाऊ द्यावयाचे व नंतर ते माफ करण्यासाठी पुन्हा सामान्य माणसांकडूनच कर रूपाने वसुली करावयाची हे महाभयंकर आहे़
- बँक कर्मचारी संघटनांनी थकीत कर्जासंबंधी उठवलेला आवाज, रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे़ हा आवाज थकीत आणि ही राष्ट्रीय चर्चा दडवण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारने बँकींग सुधारणा कार्यक्रम असे नाव देऊन बँकांच्या एकत्रितकरणाचे धोरण पुढे रेटले आहे़
- स्टेट बँक समुहातील ५ सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलिनीकरण हा केंद्र सरकार पुरस्कृत कार्यक्रम त्याचाच भाग आहे़ त्या पाठोपाठ अन्य सरकारी बॅकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे़
- अजुनही ३५ टक्के जनतेला बँकींग सेवा उपलब्ध नाहीत त्यासाठी बँकांच्या शाखाचा विस्तार आवश्यक असताना एकत्रिकरणाव्दारे सरकार केवळ शाखाच नव्हे तर बॅकांचा बंद करून जनतेचा आर्थीक सेवांपासून वंचित ठेवू पाहात आहे.