शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पावसाचा इशारा काय? पुढील दोन दिवसांत कुठे किती बरसणार? देशभरात पावसाचे काय?

By पवन देशपांडे | Updated: August 30, 2017 13:42 IST

मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे

मुंबई, दि. 30 - मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला आहे. पुढील दोन दिवसही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

या भागातील लोकांनी राहावे सतर्ककोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यांना दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पुढील दोन दिवस सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातही अशाच प्रकारचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

स्कायमेटचा पावसाबद्दलचा अंदाज काय?गेल्या चोवीस तासांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानंतर आता आज काही अंशी मुसळधार पावसापासून मुंबईकरांचा सुटका होऊ शकते, असा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाºया खासगी संस्थेने वर्तविला आहे. आज (बुधवारी) अतिवृष्टी होणार नसल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. अतिवृष्टीसाठी लागणारी परिस्थिती आता पुढे सरकली असून, येत्या काळात मुंबईत मुसळधार पाऊस होणार नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सकाळपासून काही ठिकाणी पाऊस पडला आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसासारखी स्थिती आता ओसरल्याचे चित्र आहे. दुपारी मुंबईत काही ठिकाणी पावसाने विश्रांतीही घेतली आहे. 

आतापर्यंत या पावसाळ्यात किती पडला मुंबईत पाऊसगेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाने अनेकांना २६ जुलैच्या महाभयंकर आठवणी जागृत केल्या असून, एकाच दिवसात सांताकृज वेधशाळने 331.4 मिमि पावसाची नोंद केली आहे. तर 1 जानेवारीपासून आतापर्यंत 2333.9 मिमि पाऊस झाला आहे. कुलाबा परिसरात गेल्या चोविस तासांमध्ये 111 मिमि पाऊस झाला असून, यंदाच्या पावसाळ्यात 1725.6 मिमि पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

देशभरातील पावसाची स्थिती काय?देशात पाच राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, काही भागांमध्ये अजूनही पावसाची तूट आहे. जवळपास ७० टक्के भारतात सरासरी पाऊस झाला आहे. गुजरात, पश्चिम राजस्थान, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि पूर्व भारतातील त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पंजाब, चंडिगढ, राजस्थानचा उत्तरेकडील भाग, दिल्ली, उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील भाग, मध्य प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, महाराष्ट्रातील विदर्भ, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाची अद्याप तूट आहे. भारतात आतापर्यंत सरासरी 700.3 मिमि एवढा पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत 673.8 मिमि एवढा पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका