शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
4
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
5
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
6
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
7
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
10
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
11
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
12
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
13
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
14
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
15
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
16
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
17
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
18
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
19
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाची गरज काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 22:27 IST

नागपूर ते मुंबईसाठी आधीच तीन तीन मार्ग असताना चौथ्या मार्गाची गरज काय? असा खणखणीत सवाल आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - नागपूर ते मुंबईसाठी आधीच तीन तीन मार्ग असताना चौथ्या मार्गाची गरज काय? असा खणखणीत सवाल आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारशी बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा घडवून आणण्याचेही आश्वासन दिले. पोलीस बळाचा वापर करून जमिनीची मोजणी करणे, मोजणी करू न दिल्यास शेतमालकांची तुरुंगात रवानगी करणे, शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करणे हे प्रकार शासकीय यंत्रणेने तात्काळ थांबवले पाहिजेत, असा इशारा देत शरद पवार यांनी विकासाला मानवी चेहरा असायला हवा. लोकांची बरबादी करून होणाऱ्या विकासाला काही अर्थ नाही, असे खडे बोलही त्यांनी सरकारला सुनावले.नियोजित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी जात आहेत, अशा शेतकऱ्यांची परिषद आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्य मंदिरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सर्वच जिल्ह्यांचे शेतकरी आजच्या परिषदेस उपस्थित होते. मंचावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड आदींची उपस्थिती होती. यांच्यापैकी कुणाचेही यावेळी भाषण झाले नाही. या महामार्गाची ज्यांना झळ बसणार आहे, ते शेतकरी व त्यांच्या प्रतिनिधींनी मात्र आपले मनोगत व्यक्त केले. ते स्वत: शरद पवार यांनी अगदी मन लावून ऐकून घेतले. शिवाय यावेळी आलेल्या प्रत्येक निवेदनाचाही त्यांनी स्वीकार केला व त्यावरून ते सारखी नजरही मारीत होते. दोन बॅगा भरून हरकती..नाशिकचे राजू देसले हे बोलत होते. फासावर, जाऊ पण एक इंच जमीन देणार नाही, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, असे सांगत त्यांनी सोबत आणलेल्या दोन बॅगा भरून हरकती व निवेदने शरद पवार यांच्या समोर नेऊन ठेवली. त्यातली काही कागदपत्रे त्यांनी पाहिली. परिषद संपेपर्यंत या बॅगा पवार यांच्यासमोरच होत्या. या बॅगा सादर करताना नाट्यमंदिरात टाळ्यांचा कडकडाट होत होता. परिषदभर शरद पवारांवर निवेदनांचा वर्षाव होतच होता. अनेक जण निवेदन सादर करून त्यांच्या पायालाही स्पर्श करीत होते.समृद्धी महामार्गाचं नंतर बघू.. आधी सात बारा कोरा करून घ्या काल सरकारने घेतलेल्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयावर ओघाओघाने शरद पवार यांनी मत मांडलेच. समृद्धी महामार्गाचं नंतर बघू. आधी सात बारा कोरा करून घ्या. उद्यापासूनच तुम्ही ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेत जा, सहकारी सोसायट्यांमध्ये जा, तेथे सात बारा कोरा करून घ्या, कर्ज पदरात पाडून घ्या, असा सल्ला यावेळी पवार यांनी दिला. कर्जे कोणत्या प्रकारची असतात, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सरसकट म्हणजे सरसकट. आता त्यात तत्त्वत:, निकष असे शब्द कशासाठी? त्यामुळेच मला चिंता वाटते आणि माझ्या मनात शंका आहे. .................................................................................................प्रारंभी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यात बबन हरणे (ठाणे), भाऊसाहेब शिंदे (वैजापूर), चंद्रकांत क्षीरसागर (जालना), शेख रशीद शेख नूर (निधोना, जालना), बाळू हेकडे (माळीवाडा, औरंगाबाद), तुकाराम भस्मे (अमरावती), वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सिन्नरचे सोमनाथ वाघ, आमदार अमित झनक, कॉ. राम बाहेती, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, कोपरगावचे एल.एम. डांगे, आमदार पांडुरंग बरोरा, कॉ. भालचंद्र कांगो आदींचा यात समावेश होता. शहरं वाढताहेत, जमिनी जाताहेत.... शहरं वाढताहेत, त्यासाठी जमिनी जाताहेत. मग लोकांनी जगायचं कसं, असा सवाल करीत शरद पवार यांनी लोकसंख्या वाढली, पण जमिनी आहेत त्यापेक्षा कमी कमी होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्टतील एका तालुक्यातील ८२ हजार ८१२ हेक्टरपैकी आता २६ हजार ५१३ एवढीच जमीन शिल्लक आहे. कशाकशासाठी किती किती जमीन दिली याची आकडेवारीच त्यांनी यावेळी सादर केली.आता शेतकऱ्यांचे जे मनोगत ऐकले, त्यातून असं लक्षात आलं की, या प्रकरणाचा बारकाईने विचार करावा लागेल. एकत्रित भूमिका घेऊन सरकारशी चर्चा करू. त्याआधी पुन्हा सर्वसंबंधितांची बैठक घेऊ, एवढाच कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला. गडकरी मॉडेलला विरोधभाकप नेते कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, गडकरी मॉडेलला विरोध करण्याची गरज आहे. बुलेट ट्रेन कुणाच्या फायद्याची? कुणी मागणी केली? यासाठी पैसे आहेत? कायदा गुंडाळून ठेवणे हाच यांचा कायदा बनला आहे. काही तरी भव्य दिव्य करण्याच्या नादातून निर्माण झालेला गडकरी मॉडेल भ्रष्टाचाराचे कुरण ठरू पाहत आहे. शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीवर उभा राहिलेला शेंद्रा एमआयडीसीत किया कारखाना का येऊ शकला नाही. नागपूरच्या मिहानमध्येही काही आशादायी चित्र नाही. आता विकासाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाला शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीत. म्हणजे हा विकासाला विरोध वगैरे काही नाही. शेतकरी अडचणीत असताना त्याला ताकद देण्याची गरज आहे. राजकारण करण्यासाठी वा विकासाला विरोध करण्यासाठी शरद पवार इथे आलेले नाहीत. शेतकऱ्यांची दु:खे कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर ते मांडण्यासाठी जाणार कुठे? शरद पवार यांच्याकडे जाणार नाही तर कुठे जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार शेतकऱ्यांचा मृत्यू... समृद्धी महामार्गात जमीन जाणार म्हटल्यानंतर औरंगाबाद परिसरातील चार शेतकऱ्यांना ताण येऊन आपला जीव गमवावा लागला, याचा उल्लेख अनेकांनी केला. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करूनच आपल्या भाषणाची सुरुवात केली. पळशीच्या नानासाहेब पळसकर यांनी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे सांगितली व आम्हाला जमीनच द्यायची नाही, असे बजावले. भाषणाच्या शेवटी त्यांनी, ह्यजमीन आमच्या हक्काची... नाही कुणाच्या बापाचीह्ण अशी घोषणा दिली. समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. बबन हरणे यांनी तर, मूठभर सनदी अधिकाऱ्यांनी आतापासूनच या समृद्धी महामार्गाच्या अवतीभवतीची जमीन खरेदी करून ठेवलेली आहे, याकडे लक्ष वेधले. याबाबतीत मुख्यमंत्री भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप हरणे यांनी केला. फार तर १५-२० टक्के मोजणी.. आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाचे कुठेही काम सुरू झालेले नाही व ८५ टक्के तर सोडाच फारतर १५ ते २० टक्के मोजणी झाली असेल. सरकार संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. सरळ खरेदीने व्यवहार होईल, असे सांगण्यात येऊ लागले आहे. माजी आमदार डॉ.काळे यांनीही राज्य सरकारवर यांचं काहीच खरं नाही असं सांगत सरकारवर टीका केली.