शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

मुंबईत नव्या ‘नाइटलाइफ’ची गरजच काय?

By admin | Updated: April 4, 2015 05:08 IST

मुंबईत ‘नाइटलाइफ’ असावे की नसावे, यावर राजकीय आखाडा रंगलेला आहे. याच विषयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर भल्याभल्यांची

टीम लोकमत, मुंबईमुंबईत ‘नाइटलाइफ’ असावे की नसावे, यावर राजकीय आखाडा रंगलेला आहे. याच विषयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर भल्याभल्यांची तोंडेही बंद झाली आहेत. मात्र सर्वसामान्य मुंबईकर गाढ झोपेत असताना आजही मुंबईमध्ये ‘नाइटलाइफ’ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘टीम लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमधून समोर आले आहे. कायद्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रात्रभर सुरू ठेवता येत नाहीत. रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवता येतात. रेस्टॉरंटमधील परमिट रूमसाठी १.३० वाजेपर्यंत परवानगी आहे. बारदेखील रात्री १.३० वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतात. मात्र ‘टीम लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये वेगळेच चित्र समोर आले. दक्षिण मुंबईत जेथे पर्यटकांसह उच्चभ्रू कुटुंबांतील तरुण-तरुणींचा राबता असतो; तेथे रेस्टॉरंट आणि बारमध्ये वेळेच्या मर्यादा कधीच पाळल्या जात नाहीत. मध्य मुंबईमध्ये दादर असो वा सायनपर्यंतचा परिसर, येथील काही रेस्टॉरंट आणि बारदेखील वेळेच्या मर्यादा पाळत नाहीत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही सर्वसाधारण हीच स्थिती पाहण्यास मिळते.दक्षिण मुंबईतील ‘बडे मियाँ’ रोज सर्रास पहाटे ३ पर्यंत खुले असते. लगत असलेला गोकूळ बार तर तळीरामांसाठी पर्वणीच. या दोन्ही ठिकाणी दीडच्या सुमारास पोलिसांची व्हॅन आवर्जून उपस्थित असते. पण इथल्या उच्चभ्रू वर्गातील तरुण-तरुणाईला ‘फटके’ बसतील, अशी कारवाई येथे कधीही झालेली नाही. हॉटेल अथवा बारचे शटर बाहेरून बंद झालेले असले तरी आतल्या टेबलांवर ‘चिअर्स’ सुरूच असते, ते अगदी दोन-अडीच वाजेपर्यंत. पायधुनी येथील चहावाल्याकडे रात्रभरात कधीही ‘कटिंग’ चहा मिळतोच. महत्त्वाचे म्हणजे वर्षाचे १२ महिने येथे रात्री-अपरात्री निशाचरांना चहाची तलफ भागविता येते.दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागून असलेल्या ‘जीके’बारची तर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. बारचे शटर बाहेरून वेळेवर बंद होत असले तरी रात्रभर ‘खुश्की’च्या मार्गाने येथे प्रवेश मिळतो. अनेकदा पोलीसही पहाटेपर्यंत येथे मद्याचा आस्वाद लुटतात.