शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मुंबईत नव्या ‘नाइटलाइफ’ची गरजच काय?

By admin | Updated: April 4, 2015 05:08 IST

मुंबईत ‘नाइटलाइफ’ असावे की नसावे, यावर राजकीय आखाडा रंगलेला आहे. याच विषयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर भल्याभल्यांची

टीम लोकमत, मुंबईमुंबईत ‘नाइटलाइफ’ असावे की नसावे, यावर राजकीय आखाडा रंगलेला आहे. याच विषयावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर भल्याभल्यांची तोंडेही बंद झाली आहेत. मात्र सर्वसामान्य मुंबईकर गाढ झोपेत असताना आजही मुंबईमध्ये ‘नाइटलाइफ’ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘टीम लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमधून समोर आले आहे. कायद्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रात्रभर सुरू ठेवता येत नाहीत. रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवता येतात. रेस्टॉरंटमधील परमिट रूमसाठी १.३० वाजेपर्यंत परवानगी आहे. बारदेखील रात्री १.३० वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतात. मात्र ‘टीम लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये वेगळेच चित्र समोर आले. दक्षिण मुंबईत जेथे पर्यटकांसह उच्चभ्रू कुटुंबांतील तरुण-तरुणींचा राबता असतो; तेथे रेस्टॉरंट आणि बारमध्ये वेळेच्या मर्यादा कधीच पाळल्या जात नाहीत. मध्य मुंबईमध्ये दादर असो वा सायनपर्यंतचा परिसर, येथील काही रेस्टॉरंट आणि बारदेखील वेळेच्या मर्यादा पाळत नाहीत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही सर्वसाधारण हीच स्थिती पाहण्यास मिळते.दक्षिण मुंबईतील ‘बडे मियाँ’ रोज सर्रास पहाटे ३ पर्यंत खुले असते. लगत असलेला गोकूळ बार तर तळीरामांसाठी पर्वणीच. या दोन्ही ठिकाणी दीडच्या सुमारास पोलिसांची व्हॅन आवर्जून उपस्थित असते. पण इथल्या उच्चभ्रू वर्गातील तरुण-तरुणाईला ‘फटके’ बसतील, अशी कारवाई येथे कधीही झालेली नाही. हॉटेल अथवा बारचे शटर बाहेरून बंद झालेले असले तरी आतल्या टेबलांवर ‘चिअर्स’ सुरूच असते, ते अगदी दोन-अडीच वाजेपर्यंत. पायधुनी येथील चहावाल्याकडे रात्रभरात कधीही ‘कटिंग’ चहा मिळतोच. महत्त्वाचे म्हणजे वर्षाचे १२ महिने येथे रात्री-अपरात्री निशाचरांना चहाची तलफ भागविता येते.दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागून असलेल्या ‘जीके’बारची तर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. बारचे शटर बाहेरून वेळेवर बंद होत असले तरी रात्रभर ‘खुश्की’च्या मार्गाने येथे प्रवेश मिळतो. अनेकदा पोलीसही पहाटेपर्यंत येथे मद्याचा आस्वाद लुटतात.