शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१४ गावं, दोन भानगडी; तेलंगाना अन् महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये काय परिस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 09:40 IST

गावात जातानाच दोन ग्रामपंचायतींची कार्यालये, दोन जिल्हा परिषदेच्या शाळा, दोन रेशन दुकाने, दोन पाणीपुरवठा योजनांच्या टाक्या नजरेस पडतात

दीपक भातुसे, विशेष प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांवर दावा सांगत असताना सरकारकडून आणि विरोधकांकडून त्यांना जोरदार उत्तर दिले जात आहे. मात्र पूर्वीच्या आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणाच्या सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांबाबत, असे घडताना दिसत नाही. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गावात प्रवेश करतानाच हे गाव महाराष्ट्रात आहे की तेलंगणात असा प्रश्न पडतो. कारणही तसेच आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयापासून शाळा, पाण्याची टाकी, रेशनकार्ड, गावाचे बोर्ड सगळेच दोन आहेत. एक गाव बारा भानगडीसारखे.. १४ गावे, दोन भानगडी आहेत. 

गावात जातानाच दोन ग्रामपंचायतींची कार्यालये, दोन जिल्हा परिषदेच्या शाळा, दोन रेशन दुकाने, दोन पाणीपुरवठा योजनांच्या टाक्या नजरेस पडतात. यातील एकावर मराठीत मजकूर तर दुसऱ्यावर चक्क तेलगुमध्ये मजकूर होता. म्हणजेच एक ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र सरकारने बांधून दिलेले, तर दुसरे तेलंगणा सरकारने. शाळाही एक मराठी माध्यमाची आणि दुसरी तेलगु माध्यमाची, तर एक रेशनचे दुकान महाराष्ट्र सरकारमान्य तर दुसरे तेलंगणा सरकारमान्य, असा हा दुहेरी खेळ या गावात पाहायला मिळाला. इथल्या गावकऱ्यांकडे दोन राज्यांची दोन रेशनकार्ड, दोन मतदान कार्डही आहेत.

या गावांमध्ये दोन्ही राज्यांतील प्रशासन काम करते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इथे दोन मतदान केंद्रे असतात. एक असते महाराष्ट्राचे तर दुसरे तेलंगणाचे. लोकसभा निवडणुकीत कोणी कुठे मतदान करायचे, हे वाटून घेतात. काही जण महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला, तर काही जण तेलंगणामधील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करतात. विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या तारखेला होत असल्याने गावकरी महाराष्ट्र आणि तेलंगणा अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करतात.

खरे तर या गावातील लोकांची बोलीभाषा मराठीच आहे. १७ डिसेंबर १९८९ रोजी तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील या १४ गावांवर हक्क सांगितला. आंध्र प्रदेशहून तहसीलदार आले आणि त्यानंतर या गावांमध्ये ग्रामपंचायत सुरू केली. रेशन दुकानासह, शाळा आणि इतर सुविधा पुरविल्या जाऊ लागल्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि १९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रात राहतील, असा निकाल दिला हाेता. आता तेलंगणा सरकार ही गावे बळकविण्याचा प्रयत्न करीत आहे.

या गावांवर दोन राज्यांचा हक्कसीमेलगत परमडोली, तांडा, कोटा, मुकादमगुडा, महाराजगुडा, इंदिरानगर, अंतापूर, शंकरलोधी, पद्मावती, पळसगुड, भोलापठार, येसापूर, लेंडीगुडा आणि लेंडीजाळा या १४ गावांचा समावेश होता. यावर तेलंगणानेही हक्क सांगितला आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र