मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्यात असलेल्या सैन्याच्या जास्तीच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी इतरत्र सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर'ने भविष्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणात हवाई शक्ती आणि क्षेपणास्त्रांनी लढले जातील हे स्पष्ट केले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी पराभव झाला, असंही चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "सैन्याच्या बाबतीत, आपल्याकडे १२ लाख ते १५ लाख सैनिक आहेत, तर पाकिस्तानकडे ५,००,००० ते ६,००,००० सैनिक आहेत. पण हे महत्त्वाचे नाही कारण अशा प्रकारचे युद्ध आता होणार नाही. पत्रकारांशी बोलताना माजी मंत्र्यांनी इतक्या मोठ्या सैन्याची गरज काय आहे यावर प्रश्न उपस्थित केले.
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालवर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
"आता तुमच्याकडे कितीही पायदळ असले तरी काही फरक पडत नाही, कारण कोणीही तुम्हाला अशा प्रकारचे युद्ध लढू देणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे गेले नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, लढाई केवळ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरती मर्यादित होती आणि भविष्यातील युद्धेही त्याच प्रकारे सुरू राहतील. अशा परिस्थितीत, १२ लाख सैनिकांची सेना राखण्याची काय गरज आहे? त्यांचा वापर दुसऱ्या कशासाठी तरी करणे चांगले होईल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर'वरही भाष्य केले
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आम्ही हरलो. लोक मान्य करा किंवा न करा, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते, तर पाकिस्तानने ते पाडले असते अशी दाट शक्यता होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. प्रत्युत्तरादाखल, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
Web Summary : Prithviraj Chavan questions the need for 1.2 million soldiers, suggesting redeployment. He argued future conflicts rely on air power, citing 'Operation Sindoor's' failure where ground troops were ineffective and air force was grounded to prevent further losses.
Web Summary : पृथ्वीराज चव्हाण ने 12 लाख सैनिकों की आवश्यकता पर सवाल उठाया, पुन: तैनाती का सुझाव दिया। उन्होंने तर्क दिया कि भविष्य के संघर्ष हवाई शक्ति पर निर्भर करते हैं, 'ऑपरेशन सिंदूर' की विफलता का हवाला देते हुए जहां जमीनी सैनिक अप्रभावी थे और वायु सेना को नुकसान से बचाने के लिए ग्राउंड कर दिया गया था।