शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
4
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
5
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
6
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
7
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
8
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
9
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
10
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
11
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
12
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
13
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
14
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
15
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
16
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
17
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
18
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
19
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
20
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!

'MPID कायदा' काय रे भाऊ..?; महाराष्ट्रात टोरेस घोटाळ्यानंतर पुन्हा आला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:29 IST

अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले.

मुंबई - लोकांना दुप्पट गुंतवणूक रिटर्नचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीचा घोटाळा राज्यात समोर आला. टोरेसने हजारो लोकांची फसवणूक केली. टोरेस कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यात महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (MPID) हा कायदा चर्चेत आला आहे जो महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतो. गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना जास्त पैसे मिळवून देण्याची ऑफर दिली जाते अशा कंपनी अथवा संस्थेवर हा कायदा लागू होतो. जर एखाद्या आर्थिक कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली अथवा त्यांचे पैसे परत केले नाहीत तर MPID कायद्यानुसार कारवाई होते.

अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले. कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त रिटर्नचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतला आणि त्यानंतर कंपनी अचानक बंद झाली. या घोटाळ्यामुळे यात गुंतवणूक केलेल्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले. आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने टोरेसमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. पुढील ६ महिन्यात गुंतवणूकदारांचे जवळपास ४० कोटी परत मिळण्याची आशा आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. MPID कायद्यानुसार हा लिलाव होईल. लिलावातून आलेले पैसे गुंतवणूकदारांना वाटप केले जाईल.

का आणि कधी बनला MPID कायदा?

महाराष्ट्र सरकारने १९९९ साली महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा बनवला होता. राष्ट्रपतींनी २१ जानेवारी २००० साली या कायद्याला मंजुरी दिली. जेव्हा हा कायदा बनला होता तेव्हा महाराष्ट्रात अशा अनेक कंपन्या उघडल्या होत्या, जे लोकांकडून पैसे जमा करून त्यांना जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत होते. यातील काही कंपन्यांनी लोकांचे पैसे लुबाडले आणि त्यांची फसवणूक केली. ही फसवणूक झालेले बहुतांश लोक मध्यमवर्गीय आणि गरीब होते. त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन अशा फसवणूक कंपन्यांना आळा घालण्यासाठी MPID कायदा बनवला होता.

या कायद्यानुसार, जर एखाद्या संस्था किंवा कंपनीने फसवणूक करून गुंतवणूकदारांचे पैसे लंपास केले तर त्या कंपनी, संस्थेतील प्रत्येकाला जबाबदार धरलं जाते. त्यात प्रमोटर, पार्टनर, डायरेक्टर, मॅनेजर आणि कंपनी चालवण्यासाठी असणारे कर्मचारीही, जर हे लोक दोषी आढळले तर त्यांना कमाल ६ वर्षाची शिक्षा आणि १ लाखापर्यंत दंड अशी शिक्षा होते. संस्था किंवा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी होतात. एकदा आदेश पारित झाले तर संपत्तीची विक्री करून त्यातून मिळणारा पैसा गुंतवणूकदारांना परत केला जातो.

MPID कायदा असंविधानिक?

२००५ साली मुंबई हायकोर्टाने एमपीआयडी कायद्याला असंविधानिक घोषित केले होते. हायकोर्ट म्हणाले होते की, हा कायदा कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत बनलेल्या केंद्रीय कायद्याविरोधातला असून महाराष्ट्रातील हा कायदा केंद्रीय संसदेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करतो. कारण गैर बँकिंग आर्थिक संस्था, कंपन्यांनी परतावा न दिल्याचे प्रकरण कंपनी एक्ट आणि आरबीआय एक्ट १९३४ अंतर्गत येते. परंतु २०११ साली सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात एका अपीलावर सुनावणी केली. तामिळनाडूतही असाच कायदा आणला होता. सुप्रीम कोर्टाने एमपीआयडी आणि तामिळनाडूतील कायदा दोघांना योग्य ठरवले. ज्या कंपन्यांवर राज्यातील कायद्यातंर्गत कारवाई केलीय त्यांनी आरबीआयकडून कुठलेही परवाने घेतले नव्हते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. राज्याचा हा कायदा केंद्रीय कायद्यात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे MPID कायदा संविधानिक असल्याचं स्पष्ट करत तो गुंतवणूकदारांच्या हिताचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.

टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाInvestmentगुंतवणूक