शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

'MPID कायदा' काय रे भाऊ..?; महाराष्ट्रात टोरेस घोटाळ्यानंतर पुन्हा आला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:29 IST

अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले.

मुंबई - लोकांना दुप्पट गुंतवणूक रिटर्नचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीचा घोटाळा राज्यात समोर आला. टोरेसने हजारो लोकांची फसवणूक केली. टोरेस कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यात महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (MPID) हा कायदा चर्चेत आला आहे जो महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतो. गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना जास्त पैसे मिळवून देण्याची ऑफर दिली जाते अशा कंपनी अथवा संस्थेवर हा कायदा लागू होतो. जर एखाद्या आर्थिक कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली अथवा त्यांचे पैसे परत केले नाहीत तर MPID कायद्यानुसार कारवाई होते.

अलीकडेच महाराष्ट्रात टोरेस गुंतवणूक घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यात टोरेस कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लुबाडले. कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त रिटर्नचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतला आणि त्यानंतर कंपनी अचानक बंद झाली. या घोटाळ्यामुळे यात गुंतवणूक केलेल्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले. आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने टोरेसमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. पुढील ६ महिन्यात गुंतवणूकदारांचे जवळपास ४० कोटी परत मिळण्याची आशा आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. MPID कायद्यानुसार हा लिलाव होईल. लिलावातून आलेले पैसे गुंतवणूकदारांना वाटप केले जाईल.

का आणि कधी बनला MPID कायदा?

महाराष्ट्र सरकारने १९९९ साली महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा बनवला होता. राष्ट्रपतींनी २१ जानेवारी २००० साली या कायद्याला मंजुरी दिली. जेव्हा हा कायदा बनला होता तेव्हा महाराष्ट्रात अशा अनेक कंपन्या उघडल्या होत्या, जे लोकांकडून पैसे जमा करून त्यांना जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत होते. यातील काही कंपन्यांनी लोकांचे पैसे लुबाडले आणि त्यांची फसवणूक केली. ही फसवणूक झालेले बहुतांश लोक मध्यमवर्गीय आणि गरीब होते. त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन अशा फसवणूक कंपन्यांना आळा घालण्यासाठी MPID कायदा बनवला होता.

या कायद्यानुसार, जर एखाद्या संस्था किंवा कंपनीने फसवणूक करून गुंतवणूकदारांचे पैसे लंपास केले तर त्या कंपनी, संस्थेतील प्रत्येकाला जबाबदार धरलं जाते. त्यात प्रमोटर, पार्टनर, डायरेक्टर, मॅनेजर आणि कंपनी चालवण्यासाठी असणारे कर्मचारीही, जर हे लोक दोषी आढळले तर त्यांना कमाल ६ वर्षाची शिक्षा आणि १ लाखापर्यंत दंड अशी शिक्षा होते. संस्था किंवा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी होतात. एकदा आदेश पारित झाले तर संपत्तीची विक्री करून त्यातून मिळणारा पैसा गुंतवणूकदारांना परत केला जातो.

MPID कायदा असंविधानिक?

२००५ साली मुंबई हायकोर्टाने एमपीआयडी कायद्याला असंविधानिक घोषित केले होते. हायकोर्ट म्हणाले होते की, हा कायदा कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत बनलेल्या केंद्रीय कायद्याविरोधातला असून महाराष्ट्रातील हा कायदा केंद्रीय संसदेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करतो. कारण गैर बँकिंग आर्थिक संस्था, कंपन्यांनी परतावा न दिल्याचे प्रकरण कंपनी एक्ट आणि आरबीआय एक्ट १९३४ अंतर्गत येते. परंतु २०११ साली सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात एका अपीलावर सुनावणी केली. तामिळनाडूतही असाच कायदा आणला होता. सुप्रीम कोर्टाने एमपीआयडी आणि तामिळनाडूतील कायदा दोघांना योग्य ठरवले. ज्या कंपन्यांवर राज्यातील कायद्यातंर्गत कारवाई केलीय त्यांनी आरबीआयकडून कुठलेही परवाने घेतले नव्हते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. राज्याचा हा कायदा केंद्रीय कायद्यात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे MPID कायदा संविधानिक असल्याचं स्पष्ट करत तो गुंतवणूकदारांच्या हिताचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.

टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाInvestmentगुंतवणूक