शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर सामान्य मालवणकरांची भावना काय?; राजकारण्यांनो ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:59 IST

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विविध पक्षांचे नेते त्याठिकाणी भेट देत आहेत. त्यावरून मालवणकरांच्या मनात नेमकं काय हे समोर आले आहे. 

 मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली तर विरोधी महाविकास आघाडीने या प्रकरणावरून महायुती सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. इतकेच नाही तर राजकोट किल्ल्यावर अनेक नेते भेटी देत आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडलेत. या सर्व घटनांमध्ये सामान्य मालवणकरांना नेमकं काय वाटतं ते आता समोर आलं आहे.

यावेळी एका स्थानिक रिक्षाचालकाने सांगितले की, हा पुतळा पडलाय त्यावर राजकारण करू नये. सोसाट्याच्या वाऱ्यात समुद्रकिनारी असलेला हा पुतळा पडला. राजकीय पक्षांनी आपसात भांडून काय होणार? नवीन पुतळा चांगल्या प्रकारे बांधा असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण्यांनी अती केले आहे. घटना बाजूला राहिली पण राजकारण जास्त झालं. हा पुतळा नव्याने पुन्हा उभारावा, ८ महिन्यात हा पुतळा पडणं हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे आता भक्कम पुतळा उभारावा असं एकाने सांगितले. मालवण शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ABP माझानं त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.

त्याशिवाय मालवणात हा पुतळा बांधल्यापासून आमचा व्यवसाय खूप वाढला. पर्यटकांची संख्या वाढली. हा पुतळा पुन्हा बांधला जावा. आम्हाला सगळे पक्ष सारखे, राजकारण आम्हाला जमत नाही असं एका हॉटेल व्यावसायिक महिलेने सांगितले तर पुतळा उभारला ते चांगले झाले पण पंतप्रधान येऊन, इतका कोट्यवधी खर्च करून ८ महिन्यात पुतळा पडावा हे कोकणवासियांचे दुर्दैव आहे. राजकारणी सगळे लबाड, हे राजकारण करतायेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही बोगसगिरी करतायेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य नव्हते. पक्ष विसरा, जी घटना घडली ही फार दुर्दैवी घडली. आता नव्याने पुतळा उभारताना वादळ, वारा या वातवरणाचा अभ्यास करून भरीव करावा. थातूरमातून करून पुतळा उभारणार आणि पुन्हा असा अपमान होण्यापेक्षा तो नसलेला बरा असं हॉटेलमधील वृद्ध ग्राहकाने सांगितले. 

दरम्यान, हा पुतळा आम्ही पाहिला होता. बांधकाम बघितले होते ते काही चांगल्या गुणवत्तेचं नव्हते हाच महाराजांचा अपमान आहे. मात्र हा पुतळा का पडला, त्यामागची कारणे काय हे बाजूला पडलं आणि त्यात राजकारण सुरू झालं. चांगल्या दर्जाचा पुतळा का बनवला नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हे राजकारण करून त्यात सामान्य नागरिकांचा काही फायदा नाही. मालवणात आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. पुतळा बनवताना कुठलेही निकष पाळले नाहीत हे कळल्यावर दु:ख झालं असं एका शिक्षकाने भावना व्यक्त केली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी