शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर सामान्य मालवणकरांची भावना काय?; राजकारण्यांनो ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:59 IST

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विविध पक्षांचे नेते त्याठिकाणी भेट देत आहेत. त्यावरून मालवणकरांच्या मनात नेमकं काय हे समोर आले आहे. 

 मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली तर विरोधी महाविकास आघाडीने या प्रकरणावरून महायुती सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. इतकेच नाही तर राजकोट किल्ल्यावर अनेक नेते भेटी देत आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडलेत. या सर्व घटनांमध्ये सामान्य मालवणकरांना नेमकं काय वाटतं ते आता समोर आलं आहे.

यावेळी एका स्थानिक रिक्षाचालकाने सांगितले की, हा पुतळा पडलाय त्यावर राजकारण करू नये. सोसाट्याच्या वाऱ्यात समुद्रकिनारी असलेला हा पुतळा पडला. राजकीय पक्षांनी आपसात भांडून काय होणार? नवीन पुतळा चांगल्या प्रकारे बांधा असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण्यांनी अती केले आहे. घटना बाजूला राहिली पण राजकारण जास्त झालं. हा पुतळा नव्याने पुन्हा उभारावा, ८ महिन्यात हा पुतळा पडणं हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे आता भक्कम पुतळा उभारावा असं एकाने सांगितले. मालवण शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ABP माझानं त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.

त्याशिवाय मालवणात हा पुतळा बांधल्यापासून आमचा व्यवसाय खूप वाढला. पर्यटकांची संख्या वाढली. हा पुतळा पुन्हा बांधला जावा. आम्हाला सगळे पक्ष सारखे, राजकारण आम्हाला जमत नाही असं एका हॉटेल व्यावसायिक महिलेने सांगितले तर पुतळा उभारला ते चांगले झाले पण पंतप्रधान येऊन, इतका कोट्यवधी खर्च करून ८ महिन्यात पुतळा पडावा हे कोकणवासियांचे दुर्दैव आहे. राजकारणी सगळे लबाड, हे राजकारण करतायेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही बोगसगिरी करतायेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य नव्हते. पक्ष विसरा, जी घटना घडली ही फार दुर्दैवी घडली. आता नव्याने पुतळा उभारताना वादळ, वारा या वातवरणाचा अभ्यास करून भरीव करावा. थातूरमातून करून पुतळा उभारणार आणि पुन्हा असा अपमान होण्यापेक्षा तो नसलेला बरा असं हॉटेलमधील वृद्ध ग्राहकाने सांगितले. 

दरम्यान, हा पुतळा आम्ही पाहिला होता. बांधकाम बघितले होते ते काही चांगल्या गुणवत्तेचं नव्हते हाच महाराजांचा अपमान आहे. मात्र हा पुतळा का पडला, त्यामागची कारणे काय हे बाजूला पडलं आणि त्यात राजकारण सुरू झालं. चांगल्या दर्जाचा पुतळा का बनवला नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हे राजकारण करून त्यात सामान्य नागरिकांचा काही फायदा नाही. मालवणात आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. पुतळा बनवताना कुठलेही निकष पाळले नाहीत हे कळल्यावर दु:ख झालं असं एका शिक्षकाने भावना व्यक्त केली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी