शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर सामान्य मालवणकरांची भावना काय?; राजकारण्यांनो ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:59 IST

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विविध पक्षांचे नेते त्याठिकाणी भेट देत आहेत. त्यावरून मालवणकरांच्या मनात नेमकं काय हे समोर आले आहे. 

 मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली तर विरोधी महाविकास आघाडीने या प्रकरणावरून महायुती सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. इतकेच नाही तर राजकोट किल्ल्यावर अनेक नेते भेटी देत आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडलेत. या सर्व घटनांमध्ये सामान्य मालवणकरांना नेमकं काय वाटतं ते आता समोर आलं आहे.

यावेळी एका स्थानिक रिक्षाचालकाने सांगितले की, हा पुतळा पडलाय त्यावर राजकारण करू नये. सोसाट्याच्या वाऱ्यात समुद्रकिनारी असलेला हा पुतळा पडला. राजकीय पक्षांनी आपसात भांडून काय होणार? नवीन पुतळा चांगल्या प्रकारे बांधा असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण्यांनी अती केले आहे. घटना बाजूला राहिली पण राजकारण जास्त झालं. हा पुतळा नव्याने पुन्हा उभारावा, ८ महिन्यात हा पुतळा पडणं हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे आता भक्कम पुतळा उभारावा असं एकाने सांगितले. मालवण शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ABP माझानं त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.

त्याशिवाय मालवणात हा पुतळा बांधल्यापासून आमचा व्यवसाय खूप वाढला. पर्यटकांची संख्या वाढली. हा पुतळा पुन्हा बांधला जावा. आम्हाला सगळे पक्ष सारखे, राजकारण आम्हाला जमत नाही असं एका हॉटेल व्यावसायिक महिलेने सांगितले तर पुतळा उभारला ते चांगले झाले पण पंतप्रधान येऊन, इतका कोट्यवधी खर्च करून ८ महिन्यात पुतळा पडावा हे कोकणवासियांचे दुर्दैव आहे. राजकारणी सगळे लबाड, हे राजकारण करतायेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही बोगसगिरी करतायेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य नव्हते. पक्ष विसरा, जी घटना घडली ही फार दुर्दैवी घडली. आता नव्याने पुतळा उभारताना वादळ, वारा या वातवरणाचा अभ्यास करून भरीव करावा. थातूरमातून करून पुतळा उभारणार आणि पुन्हा असा अपमान होण्यापेक्षा तो नसलेला बरा असं हॉटेलमधील वृद्ध ग्राहकाने सांगितले. 

दरम्यान, हा पुतळा आम्ही पाहिला होता. बांधकाम बघितले होते ते काही चांगल्या गुणवत्तेचं नव्हते हाच महाराजांचा अपमान आहे. मात्र हा पुतळा का पडला, त्यामागची कारणे काय हे बाजूला पडलं आणि त्यात राजकारण सुरू झालं. चांगल्या दर्जाचा पुतळा का बनवला नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हे राजकारण करून त्यात सामान्य नागरिकांचा काही फायदा नाही. मालवणात आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. पुतळा बनवताना कुठलेही निकष पाळले नाहीत हे कळल्यावर दु:ख झालं असं एका शिक्षकाने भावना व्यक्त केली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी