शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ! मविआचा महामोर्चा कशासाठी? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:39 IST

"मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे."

बऱ्याच वर्षांनंतर देशाने एवढा मोठा मोर्चा पाहिला असेल. ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अद्यापही बेळगाव, कारवार आदिंसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "कुणीही यायचं आणि डिवचून जायचं? आज सर्वपक्षाचे झेंडे. सर्वपक्ष एकवटलेत. ही ताकद महाराष्ट्राची आहे. फक्त महाराष्ट्र द्रोहीच या मोर्चात नाहीत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये. त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांचे (बाळासाहेबांचे विचार) विचार नाहीत ते. त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे त्यांचे विचार नव्हते. खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेशी आम्ही तडजोड करणार नाही. होऊ देणार नाही आणि असे जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना."

"मी त्यांना (राज्यपालांना) राज्यपाल मानत नाही, त्या पदावर कोणीही बसावे आणि कुणालाही टपल्यात मारावे हे आम्ही सहन करणार नाही. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतायत, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलतायत, ज्योतिराव फुलेंबद्दल बोलतायत. जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले झाले नसते तर आपण कुठे असतो, त्याचे उदाहरण आपल्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरून दाखविले आहे. हे वैचारिक दारिद्र्य आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

"आपल्या मुंबईचे पालकमंत्री, त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बरोबरी या खोके घेऊन पसार झालेल्यांसोबत केली. हे आपल्या राजकीय पक्षाच्या, स्वत:च्या आईच्या छातीत वार करून पसार झाले, त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करताय," अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMumbaiमुंबईShiv Senaशिवसेना