शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

...त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ! मविआचा महामोर्चा कशासाठी? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:39 IST

"मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे."

बऱ्याच वर्षांनंतर देशाने एवढा मोठा मोर्चा पाहिला असेल. ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अद्यापही बेळगाव, कारवार आदिंसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "कुणीही यायचं आणि डिवचून जायचं? आज सर्वपक्षाचे झेंडे. सर्वपक्ष एकवटलेत. ही ताकद महाराष्ट्राची आहे. फक्त महाराष्ट्र द्रोहीच या मोर्चात नाहीत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये. त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांचे (बाळासाहेबांचे विचार) विचार नाहीत ते. त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे त्यांचे विचार नव्हते. खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेशी आम्ही तडजोड करणार नाही. होऊ देणार नाही आणि असे जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना."

"मी त्यांना (राज्यपालांना) राज्यपाल मानत नाही, त्या पदावर कोणीही बसावे आणि कुणालाही टपल्यात मारावे हे आम्ही सहन करणार नाही. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतायत, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलतायत, ज्योतिराव फुलेंबद्दल बोलतायत. जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले झाले नसते तर आपण कुठे असतो, त्याचे उदाहरण आपल्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरून दाखविले आहे. हे वैचारिक दारिद्र्य आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

"आपल्या मुंबईचे पालकमंत्री, त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बरोबरी या खोके घेऊन पसार झालेल्यांसोबत केली. हे आपल्या राजकीय पक्षाच्या, स्वत:च्या आईच्या छातीत वार करून पसार झाले, त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करताय," अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMumbaiमुंबईShiv Senaशिवसेना