शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

पीक वाचवायला पाणी चोरले तर काय बिघडले?

By admin | Updated: October 24, 2015 03:25 IST

पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार

माळेगाव : पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. पणदरे येथील खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीचोरीच्या घटना वाढल्या असून चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी जलसंपदामंत्री राहिलेल्या अजित पवारांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे.यंदा दुष्काळाचे सावट असल्याने पाण्याची उपलब्धता कमी आहे. येणाऱ्या काळात शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपणही वेळेतच शेततळ्याची व्यवस्था करावी. ठिबक सिंचनावर अधिकाधिक भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच धान्य महागले आहे, डाळ दोनशे रुपयांवर गेली आहे, अशा परिस्थितीत आम्ही खायचे काय? असा सवालही त्यांनी सरकारला केला. दुधाला १९ रुपयांहून अधिक दर देणे अशक्यशासन दुधाला २० रुपये दर देण्यास सांगत आहे. मात्र, सगळा हिशेब केला तर १९ रुपयांपेक्षा जास्त दर देऊच शकत नाही. काही दूध संघ तोटा सहन करून दर देतात, असेही पवार कळस (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.