शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचवायला पाणी चोरले तर काय बिघडले?

By admin | Updated: October 24, 2015 03:25 IST

पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार

माळेगाव : पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. पणदरे येथील खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीचोरीच्या घटना वाढल्या असून चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी जलसंपदामंत्री राहिलेल्या अजित पवारांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे.यंदा दुष्काळाचे सावट असल्याने पाण्याची उपलब्धता कमी आहे. येणाऱ्या काळात शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपणही वेळेतच शेततळ्याची व्यवस्था करावी. ठिबक सिंचनावर अधिकाधिक भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच धान्य महागले आहे, डाळ दोनशे रुपयांवर गेली आहे, अशा परिस्थितीत आम्ही खायचे काय? असा सवालही त्यांनी सरकारला केला. दुधाला १९ रुपयांहून अधिक दर देणे अशक्यशासन दुधाला २० रुपये दर देण्यास सांगत आहे. मात्र, सगळा हिशेब केला तर १९ रुपयांपेक्षा जास्त दर देऊच शकत नाही. काही दूध संघ तोटा सहन करून दर देतात, असेही पवार कळस (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.