शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पाकच्या कोर्टात आधी टाकलेल्या 'बॉल’चे काय झाले? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 11, 2016 16:20 IST

पाकिस्तानला पुरावे देऊन कारवाईची वाट बघण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला पुरावे देऊन कारवाईची वाट बघण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. 
पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले करायचे, त्या हल्ल्यात आमचे पाच-दहा जवान शहीद व्हायचे व मग पाकिस्तानच्या कोर्टात कारवाईचा ‘फुटबॉल’ टाकून आपण निपचित पडायचे. संसदेवरील हल्ल्याचा ‘बॉल’ही असाच त्यांच्या कोर्टात गेला. मुंबईवरील हल्ल्याचा बॉलही पाकड्यांच्या कोर्टातच गेला. पाकच्या कोर्टात आपण आतापर्यंत इतके बॉल ढकलले आहेत की या ‘बॉल’चा लिलाव करून पाकिस्तानच्या ठणठणाट असलेल्या तिजोरीत मोठी भर पडू शकेल. पठाणकोटचा बॉल टाकण्याआधी पाकच्या कोर्टात या आधी टाकलेल्या सर्व ‘बॉल’चे काय झाले? याचा विचार कुणी केल्याचे दिसत नाही. त्यांनी आम्हाला धरून आपटायचे व आपण त्यांच्या कोर्टात फक्त बॉल ढकलत पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे. हे ‘बॉल’ प्रकरण हिंदुस्थानच्या सुरक्षेचे व इज्जतीचे धिंडवडेच काढीत आहे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात टीका करण्यात आली आहे. 
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू होता व त्याला फासावर लटकवल्याबद्दल पाकमधील सर्वच दहशतवादी संघटनेने थयथयाट केला होता. त्या अफझल गुरूचा सूड एक दहशतवादी संघटना घेऊ शकते. मग पठाणकोटचा सूड इतका मोठा प्रचंड लष्करी सामर्थ्य वगैरे असलेला देश का घेऊ शकत नाही? मुंबईवरील हल्ल्यानंतरही आपण तसे हात चोळतच बसलो व पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कोण काय चोळत बसले आहे ते त्यांनाच ठाऊक. सरकार म्हणून काही मजबुर्‍या असू शकतात, पण या मजबुर्‍या फक्त हिंदुस्थानच्याच बाबतीत का असाव्यात?  असा सवाल या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. 
 
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे 
पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोट हवाई तळाचा दौरा केला व जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्राण पणास लावून जवानांनी हिंदुस्थानची इभ्रत वाचवली याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी तिकडे पाकिस्तानात हिंदुस्थानच्या जखमेवरील खपली काढण्याचे काम जैश-ए-मोहम्मदवाल्यांनी केले आहे. फक्त सहा अतिरेकी हिंदुस्थानच्या लष्कराला भारी पडले अशी खिल्ली ‘जैश’कडून उडवली गेली. या लोकांच्या नांग्या ठेचणे किती गरजेचे आहे याचाच हा पुरावा नाही का? अशा सैतानांना मूंहतोड जबाब दिल्याशिवाय मुंबई-पठाणकोटसारखे प्रकार थांबणार नाहीत. हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी क्षत्रिय धर्माचे पालन करून देशाच्या दुश्मनांचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर सारेच अवघड होऊन जाईल. सध्या शाकाहारीचा बराच बोलबाला आहे व केंद्र सरकारातील बरेच कर्ते पुरुष हे शुद्ध शाकाहारी आहेत, पण आज पठाणकोटचा हल्ला त्या सगळ्यांच्या घशातील ‘हड्डी’ बनला आहे. ही ‘हड्डी’ गिळताही येत नाही व बाहेर काढताही येत नाही अशी बिकट स्थिती आहे.
बॉल पाकिस्तानच्या कोर्टात, म्हणजे ‘Ball in Pakistan’s court’ असे जाहीर झाले आहे. पठाणकोटवरील हल्ल्याचा सूत्रधार अझर मसूद व त्याचा भाऊ आहे. हिंदुस्थानात ‘जिहाद’ पुकारण्यासाठी त्याच ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेत तो सतत ऑनलाइन भरती करत असतो. हिंदुस्थानवर हल्ला करण्याबाबत त्यांची सैतानी वक्तव्ये पाहिली तर पठाणकोटवरील हल्ल्याबाबत पाक सरकारला कोणतेही पुरावे देण्याची गरज नसावी. पण आता पाक सरकार पुरावे मागील व त्या पुराव्याच्या खेळखंडोबात पठाणकोटचा ‘फुटबॉल’ पंक्चर होईल. 
 
पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले करायचे, त्या हल्ल्यात आमचे पाच-दहा जवान शहीद व्हायचे व मग पाकिस्तानच्या कोर्टात कारवाईचा ‘फुटबॉल’ टाकून आपण निपचित पडायचे. संसदेवरील हल्ल्याचा ‘बॉल’ही असाच त्यांच्या कोर्टात गेला. मुंबईवरील हल्ल्याचा बॉलही पाकड्यांच्या कोर्टातच गेला. पाकच्या कोर्टात आपण आतापर्यंत इतके बॉल ढकलले आहेत की या ‘बॉल’चा लिलाव करून पाकिस्तानच्या ठणठणाट असलेल्या तिजोरीत मोठी भर पडू शकेल. पठाणकोटचा बॉल टाकण्याआधी पाकच्या कोर्टात या आधी टाकलेल्या सर्व ‘बॉल’चे काय झाले? याचा विचार कुणी केल्याचे दिसत नाही. त्यांनी आम्हाला धरून आपटायचे व आपण त्यांच्या कोर्टात फक्त बॉल ढकलत पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे. हे ‘बॉल’ प्रकरण हिंदुस्थानच्या सुरक्षेचे व इज्जतीचे धिंडवडेच काढीत आहे. पठाणकोटचा हल्ला हा अफझल गुरूला फासावर लटकवल्याचा बदला असल्याचे जैश-ए-मोहम्मदने जाहीर केले. संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू होता व त्याला फासावर लटकवल्याबद्दल पाकमधील सर्वच दहशतवादी संघटनेने थयथयाट केला होता. त्या अफझल गुरूचा सूड एक दहशतवादी संघटना घेऊ शकते. मग पठाणकोटचा सूड इतका मोठा प्रचंड लष्करी सामर्थ्य वगैरे असलेला देश का घेऊ शकत नाही? मुंबईवरील हल्ल्यानंतरही आपण तसे हात चोळतच बसलो व पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कोण काय चोळत बसले आहे ते त्यांनाच ठाऊक. सरकार म्हणून काही मजबुर्‍या असू शकतात, पण या मजबुर्‍या फक्त हिंदुस्थानच्याच बाबतीत का असाव्यात? रशिया, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडसारखी राष्ट्रे त्यांच्या मुळावर येणार्‍यांचा चोख बंदोबस्त जगाची पर्वा न करता सतत करीत असतात. कारवाईचे बॉल दुश्मन राष्ट्रांच्या कोर्टात ढकलून ते पुढचे बॉल खेळत बसत नाहीत. जगाकडून आपण निदान एवढे तरी शिकायलाच हवे. 
 
जगाचे मन जिंकायच्या गोष्टी सध्या सुरू आहेत, पण त्या जुगारात आमची भारतमाता हिरव्या कौरवांनी जिंकू नये व वनवासात जायची वेळ येथील राष्ट्राभिमानी जनतेवर येऊ नये हीच आमची तळमळ आहे. हल्ले पचविण्याची आपली सहनशक्ती वाखाणण्यासारखी आहे. पण शेवटी सहनशक्तीचाही स्फोट होतोच. पंतप्रधान मोदी यांच्याही सहनशक्तीचा स्फोट होऊन त्या स्फोटात ‘जैश’सारख्या देशाच्या दुश्मनांच्या चिंधड्या चिंधड्या होवोत हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.