शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

युद्धकैद्याला अटक झाल्यास नेमकी काय वागणूक मिळते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:02 IST

शत्रूच्या हातात सापडलेल्या युद्धकैद्याला अटक झाल्यानंतर नेमकी काय वागणूक मिळते, त्याच्याकडून शत्रू माहिती काढून घेण्यासाठी कसे प्रयत्न करतो, अशा अनेक शंकांना गु्रप कॅप्टन दिलीप परुळकर (निवृत्त) यांनी दिलेली उत्तरे. ते स्वत: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या कैदेत होते.

शत्रूच्या ताब्यात युद्धबंद्यांना काय वागणूक मिळते?युद्धकैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास काय शिक्षा होते?जीनिव्हा करारानुसार युद्धकैद्याला वागणूक देण्याची नियमावली आहे. त्यांना मारहाण, यातना तसेच छळ करणे, यास प्रतिबंध आहे. मात्र, अनेकदा कैद्यांची माहिती लपविली जाते. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी छळ केला जातो. युद्धकैदी पळून जाताना सापडल्यास त्याला महिनाभर अंधाऱ्या खोलीत एकटे ठेवले जाते. माझे विमानही १९७१च्या युद्धात पाकिस्तानमध्ये कोसळले होते. मीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तिघे जण पळून जाण्यास जवळपास यशस्वी झालो होतो. मात्र, आम्हाला पुन्हा अटक करून, वेगळे ठेवण्यात आले.

अभिनंदनच्या बाबतीत काय झाले असेल? माहिती काढण्यासाठी त्याला मारहाण, छळ झाला असेल ?अभिनंदनचे फोटो जे वृत्तपत्र दाखवण्यात आले, त्यावरून असे वाटते की त्याला मारहाण झाली असावी. आम्ही ज्या ठिकाणी हल्ला करतो त्या ठिकाणी स्फोटकांमुळे मोठा परिसर नष्ट होतो. यात आजूबाजूच्या स्थानिकांचेही नुकसान होते. यामुळे त्यांचा राग साहजिकच असतो. अभिनंदलाही स्थानिकांकडून मारहाण झाली. १९७१च्या युद्धात जे भारताचे जे युद्धकैदी होते त्यांना जवळपास स्थानिक लोकांनी मारहाण केली होती. माझाही हाच अनुभव होता. स्थानिक ‘ये काफीर हे, इसे मार डालो,’ असे म्हणत माझ्यावर धावून आले होते. मात्र, एका पोलिसाने मला वाचविले. तो युनिफॉर्ममध्ये असल्याने तसेच त्याच्याकडे विशेष अधिकार असल्याने त्याने स्थानिकांना ‘ये अपने आर्मी के लिए जिंदा जादा फायदेका है, इससे एअर फोर्सकी जानकारी मिलेगी,’ असे म्हणत जमावापासून मला वाचविले.

युद्धकैद्याला नियमांनुसार अशी वागणूक देणे योग्य आहे का?युद्धकैद्याला अशी वागणूक देणे जिनिव्हा कराराचे उल्लंघन आहे. 

शत्रूच्या सीमेत गेल्यावर, त्यांच्या हाती लागल्यावर काय करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते का?प्रतिकूल परिस्थितीत जिवंत कसे राहायचे, यासाठी सैनिकांना ‘जंगल अ‍ॅण्ड स्नो सर्व्हायव्हल’ असा कोर्स असतो. विमान खाली पडल्यास तसेच शत्रूच्या हद्दीत गेल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.

शत्रूच्या यातनांमुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना आहेत का ?माझ्या माहितीप्रमाणे हवाई दलात आतापर्यंत अशी घटना झालेली नाही. आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप सक्षम असतो. आमचे प्रशिक्षण उच्च दर्जाचे असते. लढाईला जाताना मोठी तयारी असते. मी कैदेत सापडलो तेव्हा माझ्या डोक्याला मार लागला होता. मला महिनाभर दिसत नव्हते. त्यानंतरही माझी दृष्टी व्यवस्थित नव्हती. त्यावेळी त्यांनी आम्हाला विरंगुळ्यासाठी पुस्तके दिली होती.

युद्धकैद्याला किती दिवसांत परत त्याच्या मायदेशी पाठवावे, याची काय नियमावली आहे?अशी काही नियमावली नाही. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातील अनेक ऑफिसर्स जवानांचे मृतदेह सापडले नाहीत. मृत्यू झाला असावा, असे सांगून त्यांना कैदेत ठेवले होते. त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात त्यांची चौकशी करून आले आहेत. मात्र, अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही.

युद्धकैद्याला परत पाठविण्याची काय प्रक्रिया असते?प्रीझनर्स ऑफ वॉर एक्स्चेंजद्वारे युद्धकैदी एकमेकांना सुपुर्द केले जातात. १९७१ च्या युद्धात भुट्टोंनी भारताचे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे मिळून ७०० सैनिक ताब्यात घेतले होते. भुट्टोंनी आम्हाला सोडले. याच वेळी भारताने पाकिस्तानच्या ९३ हजार युद्धकैद्यांना मुक्त केले होते.

 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान