शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

काय म्हणता... कसे राहणार यंदाचे पीकपाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2023 10:47 IST

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, शब्दांकन : श्रीकिशन काळे

यंदा कमी पाऊस असल्याने सर्वांच्या डोळ्यांत पाणी येणार आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसेल. कारण त्यांचे सर्व अर्थकारण पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्रात यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. जूनमध्ये तर मोठा खंड पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत आणि चांगला, मोठा पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात.

महाराष्ट्रात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर मी देत असतो. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला येथे पावसात मोठा खंड राहणार आहे. दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण साधारण राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड असे यंदाचा पाऊस असणार आहे.

दुष्काळी पट्ट्यात नेहमीपेक्षा अजून कमी पाऊस असेल. साधारणपणे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर इथे सरासरी एवढा म्हणजे १०० टक्के पाऊस होऊ शकेल. पश्चिम विदर्भ अकोला इथे सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पाऊस पडेल. कोकणातही सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९४ टक्के पाऊस होणार आहे. धुळे, जळगाव इथेही ९३ टक्केच पाऊस होईल. एकूणच यंदा पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याने सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. 

केवळ पिकांवरच नाही, तर जनावरांवरही परिणाम होणार आहे. पावसामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत असतो. आताच पाण्याचे दुर्भिक्ष्य झालेले आहे. पाऊस नसल्याने पेरण्याच होऊ शकत नाहीत. पाऊस अपुरा पडणार आहे. कमी पावसाचे हे वर्ष आहे. सर्वांना जपून पाणी वापरणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उभे राहणार आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.   

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करावी. पीकपद्धतीनुसार बियाणे व खतांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खरीप पिकांसाठी जमीन तयार करून शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून स्वच्छता करायला हवी. तसेच पाऊस कमी असल्याने ठिबक सिंचनावर भर द्यावा. उन्ह खूप असल्याने जनावरांना गोठ्यातच मुबलक पाणी द्यावे. पाऊस कमी झाल्याने पिकांवर परिणाम होतोच. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतील. पाऊस अजून आलेला नाही. पेरण्या उशिरा होणार आहेत. त्याचा सर्व अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. दुष्काळी भागातील पट्ट्यात याची सर्वाधिक झळ पोचेल.   

शेतकऱ्यांनी काय करावे? 

शेतकऱ्यांनी यंदा कमी पाऊस असल्याने कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत. जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कारण एक पाऊस झाला आणि लगेच पेरणी केली, तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढऊ शकते. म्हणून अगोदरच मोठा, चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्या करायला घ्याव्यात.  कमी कालावधीमध्ये मूग, मटकी, चवळी, घेवडा अशी पिके घेतली, तर त्याचा फायदा होईल. खरिपात काही तरी उत्पन्न मिळू शकेल. तसेच रब्बीमध्ये कमी पावसावर येणारी हरबरा, करडई आदी पिके घेणे आवश्यक आहे. खूप पाणी लागणारी पिके घेऊ नयेत. कारण तसा पाऊस पडणार नाही.

यंदा दुष्काळी स्थिती? 

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे. म्हणून आतापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. जूनमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार आहे. काही भागात चांगला पाऊस होईल. जिथे ६५ मिलिमीटर पाऊस होईल, तिथे पेरण्या करता येऊ शकतील. तोपर्यंत पेरण्या करू नयेत. १९७२ नंतर २००३, २००५, २००९, २०१२, २०१५, २०१८ मध्ये दुष्काळी स्थिती होती. गेल्या काही वर्षांमध्ये एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळासाठी हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हवामान बदल. या दोन्ही घटकांमुळे दुष्काळ पडत आहे.  

पावसाचा पॅटर्न बदलतोय... 

कमी पाऊस असल्याने आपले व्यवस्थापन सुधारावे लागणार आहे. दरवर्षीपेक्षा काही वर्षांतील पावसात खूप फरक दिसतोय. कमी कालावधीत अधिक पाऊस पडत आहे. तसेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस काही वर्षात झाला आहे. पण यंदा मात्र कमी होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील हवेचे दाब बदलत आहेत. हवेचा दाब कमी झाला की, मान्सून आपल्याकडे येईल.      

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती