शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक?

By अतुल कुलकर्णी | Updated: July 17, 2022 08:01 IST

अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर भेट झाली.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय राजसाहेब, नमस्कार, 

नुकतीच आपली आणि देवेंद्रभाऊंची भेट झाली. भेटीचे फोटो छापून आले. वहिनी साहेबांनी देवेंद्रभाऊंना ओवाळले. सगळ्यांनी ते पाहिले. तुम्हा दोघांमध्ये काय गुफ्तगू झालं, याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. तुम्ही दोघं नेमकं काय बोललात..? आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना मंत्रिपद देऊ का?, असं विचारायला देवेंद्रभाऊ आले होते का..? चॅनलवाल्यांची डोकी भारी चालतात. अमितला मंत्रिपद देण्याचा शोधदेखील त्यांनीच लावला होता, असं आपण कोणाला तरी सांगत होता म्हणे... पण काय हरकत आहे अमित मंत्री झाला तर..? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, असं नाही वाटत का तुम्हाला..?

खरं तर तुम्ही दोघांनी जिथं कुठं चर्चा केली, त्या खोलीत चॅनलवाल्यांना बोलावून ठेवायला पाहिजे होतं... म्हणजे महाराष्ट्राचा या चर्चेत वेळ तरी गेला नसता... तुम्ही म्हणाल, असली नसती चर्चा तुम्हाला कशाला पाहिजे...? पण साहेब रुपया घसरला... डॉलर वधारला... महागाई वाढली... नाले तुंबले... घरापर्यंत पाणी आलं... हे विषय तेवढे महत्त्वाचे नाहीत. रुपया घसरला तर पुन्हा वर सरकवून नीट कमरेला बांधता येईल... पण मंदिर, धर्म, राजकारण, तुमची भेट हे विषय महाराष्ट्रात महत्त्वाचे आहेत... तेव्हा यावरच चर्चा व्हायला पाहिजे की नाही... असो. तुम्हाला नाही पटायचं... असो... आपल्या तब्येतीची चौकशी करायला जाणार हे देवेंद्रभाऊंनी विधानसभेतच जाहीरपणे सांगितलं होतं. शिवाय आपण त्यांना जे पत्र लिहिलं त्याचंही त्यांना जाम कौतुक होतं... आपल्याला असं लिहिता येणार नाही, हे त्यांनी कबूल केलं होतं... पत्र न लिहिताही त्यांना बऱ्याच गोष्टी पडद्याआडून करता येतात हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिलंय... वेश पालटून ते कसे जायचे, याचाही गौप्यस्फोट अमृता वहिनींनी केलाच आहे... असो. आमच्या पुढ्यात वेगळाच प्रश्न उभा राहिलायं... 

त्या सुप्रियाताई सुळेंनी आपल्या भेटीवर एक मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आमच्या पुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या म्हणाल्या, “काय दिवस आले बघा... ज्याच्याकडं एक आमदार आहे त्या नेत्याला भेटायला १०५ आमदार असणारा नेता गेला...”, त्यांचं हे विधान चूक की बरोबर..? राजकारणात कोणी कोणाला भेटायला जाताना टायमिंग फार महत्त्वाचं असतं. मात्र, एखादा नेता आजारी पडला, तर त्याला भेटायला जाताना कोणाकडे किती आमदार आहेत हा हिशोब महत्त्वाचा ठरतो का..? या न्यायाने ताईंच्या पक्षाचे नेते, चार खासदारांच्या जिवावर साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत... राष्ट्रपती झाले पाहिजेत... असं कशाच्या आधारावर बोलतात..? अर्थात हा प्रश्न डोक्यात आला म्हणून विचारला... तो चूक की बरोबर हे सुद्धा माहिती नाही...

पण राज साहेब, ताई जे बोलल्या ते एकदम शंभर टक्के खरं बोलल्या. आजारी असलं म्हणून काय झालं..? ज्याच्याकडे एक आमदार त्याच्याकडे १०५ वाल्यांनी जायचं काय काम..? त्यापेक्षा १०५ वाल्यांनी ५३ वाल्या एनसीपीला बोलवायला पाहिजे होतं... तसं न करता ते उगाच ५० वाल्या एकनाथ शिंदेंसोबत गेले... एकनाथरावांकडे असणारे ५० वेगवेगळ्या पक्षाचे... त्यापेक्षा ताईंकडचे ५३ एकगठ्ठा एकाच पक्षाचे... त्यातल्या दोघांना तर एकाच ठिकाणी ठेवलेलं.... जेव्हा पाहिजे तेव्हा बोलावून घेता आलं असतं... तसं झालं असतं तर एका झटक्यात पुन्हा नवीन सरकार बनलं असतं... उगाच एक आमदार असलेल्या तुमच्याकडेसुद्धा यायची त्यांना गरज पडली नसती... मागच्यासारखं पहाटेपर्यंत वाट बघायची पण गरज उरली नसती... अर्थात सगळी चूक १०५ वाल्या नेत्याचीच आहे... आपले दादा किती कर्तृत्ववान, त्यांना दिलं सोडून आणि उगाच आपलं ते सुरत, गुवाहाटी, गोवा फिरत बसले... म्हणून म्हणालो ताई, काय चूक बोलल्या...? 

राहता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा, सभ्यपणाचा... उगाच कोणी आजारी पडलं म्हणून त्याला लगेच भेटायला कशाला जायचं.... त्या भेटीच्या बातम्या आल्या... फोटो आले... ते प्रसिद्ध झाले... यात कसली आली संस्कृती...? असं केल्यानं आजारी माणूस नीट होतो का...? त्यापेक्षा एक फोन केला असता तरी चालला असता... महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते जास्त शोभलं असतं... असं नाही का वाटत साहेब तुम्हाला...? तेव्हा ताई बोलल्या ते बरोबर बोलल्या, असं आमचं ठाम मत आहे... तुमचं काय मत आहे...? - तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSupriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस