शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 22:14 IST

विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. - नीलम गोऱ्हे

पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. ज्या अपेक्षेने आमचे ६३ आमदार आलेले, बाकीच्या ठिकाणी थोडक्यात पडलेले, दुसऱ्या क्रमांकावर असलेले लोक होते. या लोकांचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा कल सुरु झाला होता. दुसरे असे की दर तीन महिन्यांनी भाजपासोबत युती तुटेल की राहिल हेच कळत नव्हते, असे विधान परिषद उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांंनी केले.

आम्हाला मत विचारलेच गेले नाही. महापौर बंगल्यामध्ये मुख्यमंत्री कोण करायचे तेव्हा मला मत विचारले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंनीच व्हावे अशी भूमिका घेतली होती. असे कोणाला वाटले होते की संघटना पूर्ण शून्य होईल, उलट ते मुख्यमंत्री झाले तर संघटना आणि पक्ष दोन्हींना गती येईल असे वाटले होते. त्याच्यात कोरोना येईल असे अपेक्षित नव्हते. तसेच एवढे बंदिस्त राजकारण होईल असेही वाटले नव्हते. यापूर्वी ते जे काम करू शकत होते. ते ते करू शकत नव्हते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने काय काय बिघडले हे गोऱ्हेंनी सांगितले.  

आमदारांचा निधी कापला गेला, मंत्र्यांचा निधी कापला गेला हे काही माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते. ते त्यांच्यासोबत वैयक्तिक होत होते. विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. मी शिवसेनेसाठीच काम करत आहे. एवढ्या अनुभवानंतर मी घडाघडा बोलू शकते, परंतू आपल्याकडून बोलता बोलता इकडचा तिकडचा शब्द जातो, तो जाऊ नये म्हणून मी भाषण वाचले असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना