शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 22:14 IST

विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. - नीलम गोऱ्हे

पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. ज्या अपेक्षेने आमचे ६३ आमदार आलेले, बाकीच्या ठिकाणी थोडक्यात पडलेले, दुसऱ्या क्रमांकावर असलेले लोक होते. या लोकांचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा कल सुरु झाला होता. दुसरे असे की दर तीन महिन्यांनी भाजपासोबत युती तुटेल की राहिल हेच कळत नव्हते, असे विधान परिषद उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांंनी केले.

आम्हाला मत विचारलेच गेले नाही. महापौर बंगल्यामध्ये मुख्यमंत्री कोण करायचे तेव्हा मला मत विचारले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंनीच व्हावे अशी भूमिका घेतली होती. असे कोणाला वाटले होते की संघटना पूर्ण शून्य होईल, उलट ते मुख्यमंत्री झाले तर संघटना आणि पक्ष दोन्हींना गती येईल असे वाटले होते. त्याच्यात कोरोना येईल असे अपेक्षित नव्हते. तसेच एवढे बंदिस्त राजकारण होईल असेही वाटले नव्हते. यापूर्वी ते जे काम करू शकत होते. ते ते करू शकत नव्हते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने काय काय बिघडले हे गोऱ्हेंनी सांगितले.  

आमदारांचा निधी कापला गेला, मंत्र्यांचा निधी कापला गेला हे काही माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते. ते त्यांच्यासोबत वैयक्तिक होत होते. विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. मी शिवसेनेसाठीच काम करत आहे. एवढ्या अनुभवानंतर मी घडाघडा बोलू शकते, परंतू आपल्याकडून बोलता बोलता इकडचा तिकडचा शब्द जातो, तो जाऊ नये म्हणून मी भाषण वाचले असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना