शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

विवाहसोहळ्याचा होतोय इव्हेंट!

By admin | Updated: April 18, 2017 02:46 IST

विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा

पुणे : विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा, यासाठी वधू आणि वरपक्षाची लगबग सुरु असते. मात्र, आजकाल विवाह सोहळा खर्चिक बनला आहे. एकीकडे कार्यालयांचे भाडे, मानपान याचे खर्च वाढत असताना लग्नासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रक्ट दिले जात आहे. प्री-वेडिंग फोटो शूट, डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग यामुळे लग्नाच्या खर्चाने लाखांचा टप्पा गाठला आहे.बदलत्या काळाप्रमाणे नववनवीन ट्रेंड डोकावत असतात. विवाह सोहळाही त्याला अपवाद राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपला विवाह हटके पध्दतीने पार पडावा, अशी तरूण-तरुणींची इच्छा असते. लग्न सोहळयात कामांची यादी संपता संपत नाही. प्रत्येकाला खुश ठेवता यावे, वरपक्षाला उणीव काढण्याची संधी मिळू नये, असाच वधू पक्षाचा प्रयत्न असतो. विवाहसोहळा कोणत्याही अडथळयाशिवाय पार पडावा, यासाठी इव्हेंट कंपनीला पाचारण केले जाते. इव्हेंट कंपनीकडील पॅकेज साधारणपणे ५ लाख रुपयांपासून सुरु होते. इव्हेंट कंपनीला काम सोपवले की वधू पक्षाचा बरासचा भार हलका होतो. मात्र, खर्चाचे गणित वाढते. बरेचदा, वरपक्षाकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी इव्हेंट कंपनीची निवड केली जाते. बरेचदा, पालकांपेक्षा मुलगा-मुलगीच याबाबतीत पुढाकार घेतात. पालक याबाबतीत फारसे उत्सुक नसतात. त्यामुळेच लग्नांचा इव्हेंट होताना पहायला मिळत आहे.प्री-वेडिंग फोटो शूटपासून लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मध्यमवर्गीय कुटुंबांमधील तरुणांमध्ये ही के्रझ मोठ्या प्रमाणात आढळून येते. फोटोग्राफरच्या मदतीने फोटो शूटचे ठिकाण, थीम आदी बाबी ठरवल्या जातात. या शूटचा खर्च साधारणपणे १० हजार रुपयांपासून सुरु होतो. गेल्या दोन वर्षात या ट्रेंडची मागणी खूप वाढली आहे. पर्वती, खडकवासला, सिंहगड या ठिकाणांपासून गोव्यापर्यंत कोणतेही आवडीचे ठिकाण ठरवून तेथे फोटो शूट केले जाते. या निमित्ताने मुला-मुलीला एकमेकांना समजून, जाणून घेण्याची संधी मिळते, असे मत तरुणांची ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.