शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मास्क घाला, काेराेनासह विषाणूजन्य आजारांना पळवा; नागरिकांसाठी ठरतोय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 01:13 IST

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे.

आविष्कार देसाई

रायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. मास्क वापरल्याने काेराेनासारख्या महाभयंकर राेगला राेखता येते, तसेच अन्य विषाणूजन्य आजारापासून आपले संरक्षणही हाेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे काेराेनासह अन्य राेगाला परतावून लावण्यासाठी मास्क वापरणे एक प्रकारे नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.काेराेना विषाणूचा फैलावाने अख्या जगाला चांगलाच हादरा दिला आहे. काेट्यवधी नागरिकांना काेराेनाची लागण झाली, तर लाखाे नागरिकांचा काेराेनाेने बळी घेतला आहे. काेराेना विषाणूचा फैलाव हा नाका-ताेंडावाटे शरीरात हाेत असल्याने मास्कचा वापर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. आराेग्य विभागही मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सातत्याने सांगत आहे.

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. २०१९ या कालावधीत जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या कालावधीत सुमारे एक हजार २०० नागरिक उपचारासाठी आले हाेते, तर ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर, २०२० या कालावाधीत फक्त ४८0 नागरिक उपचारासाठी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळाथंडीच्या दिवसामाध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचे ताप हे आजार डाेके वर काढतात. मात्र, काेराेनाच्या भीतीमुळे नागरिक मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे वातावरणातील विषाणूंना अटकाव केला जात आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी पाेषक आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विषाणूजन्य आजारसर्दी, खाेकला, ताप, टीबी, दमा असे विविध विषाणूजन्य आजार आहेत, हे आजार हवेतून सहज पसरतात. नाका-ताेंडाला मास्क नसेल, तर ते मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. त्यामुळे संबंधिताला विषाणूजन्य आजाराची बाधा निर्माण हाेऊ शकते. यासाठी मास्क वापरणे हा खरच चांगला उपाय आहे. काेराेनाबराेबर अन्य विषाणूजन्य आजाराला राेखण्याचे प्रभावी हत्यार आहे.

थंडीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचा ताप असे आजार डाेके वर काढतात. हे विषाणू हवेतून सहज पसरून मानवीच्या शरीरातमध्ये प्रवेश करतात. ज्यांची प्रतिकारशक्ती सक्षम असते, ते त्या विषाणूचा मुकाबला करतात. मात्र, अन्य जणांना या आजाराचा सामना करावा लागताे. मास्क वापरल्याने आजाराचा धाेका कमी असताे. -डाॅ. राजीव तांबाळे, जिल्हा रुग्णालय, रायगड

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस