शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वाकुर्डे, टेंभू योजनेला निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:48 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हयातील सिंचन योजनांची कामे सध्या गतीने सुरू आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे

ठळक मुद्देकृष्णा खोरे महामंडळाकडून सुरू असलेल्या कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही. याचवर्षी त्यात वाढ करून ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार

सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हयातील सिंचन योजनांची कामे सध्या गतीने सुरू आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे. केंद्राच्या मदतीमुळे जिल्हयातील पाणी योजनांचे काम अभूतपूर्व झाले असून, २०१९ अखेर सर्व योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

विविध विभागांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सांगली दौऱ्यावर होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हयातील विकासकामांवर खर्च केलेल्या निधीचा ताळेबंद व भविष्यातील विकासकामांचे नियोजन मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हयातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी योजना पूर्ण करणे गरजेचे आहे. पूर्वी कधीही झाली नव्हती इतकी कामे गेल्या तीन वर्षांत झाली आहेत. ‘प्रधानमंत्री सिंचाई योजना’ आणि ‘बळीराजा’ योजनेमुळे अत्यंत वेगाने कामे पूर्णत्वास येत आहेत. टेंभू योजनेतून जिल्'ाला विशेष फायदा होणार असून, येत्या मार्चपर्यंत पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योजनांच्या कामांना निधीची कमतरता भासू दिली नसल्याने कामे वेगाने पूर्ण होत आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे, तर याचवर्षी त्यात वाढ करून ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार आहे.

ते म्हणाले की, ५०० किलोमीटर लांबी असलेल्या योजनांची ३४५ किलोमीटरवरची कामे प्रगतीपथावर आहेत. टेंभूच्या आराखड्यामध्येही बदल केल्याने योजनेवरचा खर्च ७०० कोटींनी कमी होणार आहे. दीड वर्षात जत तालुक्यातील दोन व कवठेमहांकाळ तालुक्यातील एक अशा तीन लिफ्टचे काम पूर्ण करत मार्चअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडून सुरू असलेल्या कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.‘वाकुर्डे’ला ३० कोटी दिले, आखणी ५० कोटी देणारशिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पूर्णत्वासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेसाठी १०० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अजून ५० कोटी रुपये देण्यात येणार असून, काम पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :ministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगली