शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

सेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन

By admin | Published: February 18, 2017 4:27 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

नवी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले़ राज्यात सरकार पडावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणे हे जनतेच्या हिताचे नाही़ कोणत्याच आमदाराला मध्यावधी निवडणुका नकोत़ मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत़ त्यांच्यात निवडणुकीमुळे बिनसले आहे. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीनंतरही ते मुंबईत सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील़ मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने विजय निश्चित असून उपमहापौर आरपीआयचा असणार आहे़, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़राज्य सरकारमधून शिवसेनेने बाहेर न पडता, आरोप-प्रत्यारोपाऐवजी विकासावर भर द्यावा. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए योजना राबवणे गरजेचे आहे़ मात्र पात्र-अपात्रतेची नियमावली ठरवण्याच्या वादामुळे त्यास विलंब होत आहे, असे आठवले यांनी सांगितले़नोटाबंदीचा निर्णय घाईत झाला असला, तरी तो योग्यच आहे़ त्यामुळे गैरमार्गाने काहींच्या खिशात जाणारा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले़ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे़ त्यांनी पराभव मान्य करून सरकारला चांगल्या कामात साथ द्यावी़, असा सल्ला आठवले यांनी दिला़भाजपावर जातीयवादाचे आरोप करून ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळातच सर्वाधिक जातीवाद झाला़, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) नोटाबंदीचे जनतेने केले स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे. सरकार आरक्षणाच्या बाजूने असून केवळ ‘सबका साथ हिंदूंचा विकास’ असे नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. जातीनिहाय आरक्षण रद्द करायचे असल्यास अगोदर जाती संपवण्याची गरज आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.